शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:18 AM

वातावरणातील निरनिराळ्या वायूंची व त्यातील विषारी घटकांची २४ तास अचूक व वेगवान पद्धतीने माहितीच्या डेटा बरोबरच कुठल्या भागात वायू प्रदूषण जास्त प्रमाणात आहे

बोईसर : वातावरणातील निरनिराळ्या वायूंची व त्यातील विषारी घटकांची २४ तास अचूक व वेगवान पद्धतीने माहितीच्या डेटा बरोबरच कुठल्या भागात वायू प्रदूषण जास्त प्रमाणात आहे याचे मोजमाप करण्यासाठी तारापूर एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती तसेच अन्य दोन ठिकाणी सुरु केलेली स्टेशन मागील अडीच वर्षापासून बंद पडून अक्षरश: धूळ खात पडली आहेतारापूर एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे. एस. डब्ल्यू. स्टील लि (जिंदाल स्टील) या कारखान्याने सप्टेंबर २००९ साली ३० मेगावॅट क्षमतेचे कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन सुरू केल्यानंतर हवा व ध्वनी प्रदूषणाची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ लागल्याच्या तक्रारी म.प्र.नि. मंडळाकडे येताच मंडळाने प्रदूषण होऊ नये म्हणून काही उपाय योजना व सुधारणा सुचवून वातावरणातील हवेची गुणवत्ता तपासणारी तीन स्टेशन एमआयडीसीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचे आदेश जे.एस.डब्ल्यू. स्टील या उद्योग समूहाला दिल्यानंतर २०१२ साली ३ स्टेशन सुरु करण्यात आली होती.तारापूरला कोळसा व इंधनाच्या वापरा बरोबरच रासानिक कारखान्यातून बाहेर पडणारे वेगवेगळे धूर यामुळे वायू प्रदूषणाची प्रचंड समस्या असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवरती वातावरणातील हवेची गुणवत्ता तपासणारे स्टेशन फेब्रुवारी २०१७ पासून बंद पडले आहे. ते पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात या महिन्यात (जुलै २०१९) एक बैठक होऊन बंद पडलेली तिन्ही स्टेशन जे.एस.डब्ल्यू. स्टीलने पुन्हा सुरू करावीत, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते. मात्र सप्टेंबर २०१८ ला म.प्र.नि.मंडळाच्या ठाणे व पालघर विभागाचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी लाड यांचेशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांनी लवकरच बंद असलेली स्टेशन्स जे.एस.डब्ल्यू. स्टील किंवा एखाद्या उद्योगाच्या साहाय्याने पुन्हा सुरू करण्यात येतील आणि या दोन्ही माध्यमातून सुरू करण्यास यश न आल्यास म.प्र.नि.मंडळ चालवेल, असे लोकमतला सांगितले होते. त्यामुळे आता कागदी घोडे न नाचवता ठोस कृति करावी, अशी मागणी आहे.>आता कोण चालविणार?जेएसडब्ल्यू स्टीलचे थर्मल पॉवर स्टेशन बंद होताच हवेची गुणवत्ता तपासणारी स्टेशन झाली बंद. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता असा आहे की जे.एस.डब्ल्यू.स्टीलचे थर्मल पॉवर स्टेशन डिसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत गेले. त्यामुळे आता हवेची गुणवत्ता तपासणारी स्टेशन चालविण्याची जबाबदारी जबाबदारी म.प्र.नि.मंडळाने घेणे गरजेचे होते.>हवा प्रदूषणाचे भीषण वास्तवजागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगात दरवर्षी प्रदूषणाने सुमारे ७० लाख लोक अकाली मृत्यू पावतात. तारापूर मध्येही हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या असून लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचविते आहे. प्रदूषण स्टॅण्डर्ड पॅरामिटरच्या बाहेर कधी कधी गेले हे यावरून समजत होते.>यामुळे होते प्रदूषणकारखान्यांमधून बाहेर पडणारे घातक वायू , विविध रासायनिक कारखान्याचा धूर वाहनांच्या धुरामधील प्रदूषित वायू तर धूर, धूलिकण, धूळ किंवा इतर तरंगत राहणारे अतिसूक्ष्म कण. वाहनांच्या धुरातूनही हे कण बाहेर पडतात.>जेएसडब्ल्यू स्टील या उद्योग समूहाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून दुरुस्तीही करून घेतली असून लवकरात लवकर ही स्टेशन्स कार्यान्वित करण्यात येईल.- मनीष होळकर,उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर १