शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

पालघर-डहाणूबद्दल परेचा सावत्रपणा

By admin | Updated: December 24, 2016 02:57 IST

पालघर-डहाणू भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा बहाल करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही या भागाला उपनगरीय सेवा मिळालेल्या

पालघर : पालघर-डहाणू भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा बहाल करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही या भागाला उपनगरीय सेवा मिळालेल्या नाहीत. उलट सतत काहींनाकाही कारणास्तव इथल्या प्रवाशांच्या मागण्यांकडे पश्चिम रेल्वे सतत दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाश्यांनी निषेधाचे बॅनर वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या स्थानक परिसरात लावून आपला संताप व्यक्त केला आहे.डहाणू रोडपर्यंतच्या भागाला सन १९९५ रोजी उपनगरीय क्षेत्राचा दर्जा बहाल केल्या नंतर तब्बल १८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर १६ एप्रिल २०१३ रोजी प्रथम चर्चगेट-डहाणू लोकलला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे इथल्या स्थानिक प्रवाशांनी या लोकलचे जल्लोषात स्वागत केले होते. आता आपला मुंबई पर्यंतचा प्रवास आता सुखकर होईल अशा दिवास्वप्नात असणाऱ्या प्रवाशांच्या अनेक मागण्यांना हरताळ फासण्याचे काम पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलेले आहे.मेल-एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या मधून प्रवास करण्यावर एके ठिकाणी निर्बंध घातले जात असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी सुरु करण्यात आलेल्या काही मोजक्या लोकलमध्ये जबरदस्तीने शिरकाव करून उलट स्थानिक प्रवाश्यांच्या हक्कावर विरारच्या काही प्रवाशांकडून गदा आणली जात आहे. अश्या वेळी घुसखोरी करणाऱ्या विरार प्रवाश्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानानी कारवाई करणे अपेक्षित असताना उलट पालघरच्या प्रवाशाना मारहाण करून त्यांचावर केसेस नोंदविल्या जात आहेत. सोयीसुविधा पुरविण्याबाबत ही सतत अन्याय केला जात असल्याने प्रवाश्यामध्ये असंतोष पसरत आहे. (प्रतिनिधी)