शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पहिल्याच पावसात बुडाला वसई-विरार पालिकेचा दावा; अनेक भाग झाले जलमय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:37 IST

या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, असे आश्वासन देतानाच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली होती

विरार : वसई-विरार शहर पुढील वर्षी बुडणार नाही, असा दावा खुद्द बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर व वसई-विरार मनपाने गेल्या वर्षी केला होता, मात्र हा दावा पहिल्याच पावसात बुडाला आहे. शुक्रवारी दुपारी अर्धा तास पडलेल्या पावसात पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात पाणी तुंबल्याने वसई-विरार शहरासमोरील पावसाळ्यातील संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दुपारी वसई-विरारमध्ये पावसाने हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने विवा कॉलेज परिसरात पाणी साचले. मागील दोन वर्षीही शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही विवा कॉलेज परिसरात प्रचंड पाणी भरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना लहान बोटींद्वारे मदत पुरवावी लागली होती. या पूरस्थितीमुळे मनपा आणि बहुजन विकास आघाडीवर नागरिकांनी टीकेची झोड उठवली होती.

या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, असे आश्वासन देतानाच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली होती. यात निरी आणि आयआयटीकडून सुचवण्यात येणाºया उपाययोजनांचा समावेश होता. प्रत्यक्षात मात्र निरी आणि आयआयटी यांच्यावर १२ कोटी खर्च करूनही या संस्थांनी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पालिकेने केलेली नाही. यामुळे शहरे पुन्हा पाण्याखाली जाणार, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केली जात असतानाच, शुक्रवारी झालेल्या पावसाने ठाकूर आणि पालिकेचा दावा खोटा ठरवला.

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार