शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात बुडाला वसई-विरार पालिकेचा दावा; अनेक भाग झाले जलमय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:37 IST

या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, असे आश्वासन देतानाच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली होती

विरार : वसई-विरार शहर पुढील वर्षी बुडणार नाही, असा दावा खुद्द बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर व वसई-विरार मनपाने गेल्या वर्षी केला होता, मात्र हा दावा पहिल्याच पावसात बुडाला आहे. शुक्रवारी दुपारी अर्धा तास पडलेल्या पावसात पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात पाणी तुंबल्याने वसई-विरार शहरासमोरील पावसाळ्यातील संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी दुपारी वसई-विरारमध्ये पावसाने हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने विवा कॉलेज परिसरात पाणी साचले. मागील दोन वर्षीही शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही विवा कॉलेज परिसरात प्रचंड पाणी भरले होते. त्यामुळे येथील नागरिकांना लहान बोटींद्वारे मदत पुरवावी लागली होती. या पूरस्थितीमुळे मनपा आणि बहुजन विकास आघाडीवर नागरिकांनी टीकेची झोड उठवली होती.

या पार्श्वभूमीवर ठाकूर व मनपाचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी पुढील वर्षी वसई-विरार शहर बुडणार नाही, असे आश्वासन देतानाच मनपाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली होती. यात निरी आणि आयआयटीकडून सुचवण्यात येणाºया उपाययोजनांचा समावेश होता. प्रत्यक्षात मात्र निरी आणि आयआयटी यांच्यावर १२ कोटी खर्च करूनही या संस्थांनी सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पालिकेने केलेली नाही. यामुळे शहरे पुन्हा पाण्याखाली जाणार, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केली जात असतानाच, शुक्रवारी झालेल्या पावसाने ठाकूर आणि पालिकेचा दावा खोटा ठरवला.

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार