शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

बोंद्रेपाडावासीयांना प्यावे लागते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 3:57 AM

खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.

शेणवा : खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.मात्र, यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. पाण्यासारखी मूलभूत सेवा पुरवणे हे ग्रामपंचायतीचे आद्यकर्तव्य असतानाही ग्रा.पं. पदाधिकारी ही सेवा पुरवण्यास असमर्थ ठरल्याने ग्रा.पं.विरुद्ध ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार करून प्रशासक नेमण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने फक्त दूषित पाणी उरले आहे. दूषित पाणी भरावे लागत असल्याने गृहिणी त्रस्त आहेत. पंचायत समिती सदस्य रसाळ यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मागितला, परंतु ग्रामपंचायतीने तो ठरावही दिला नसल्याने ग्रामस्थांमध्ये खंत आहे.>बोंद्रेपाडा नळयोजनेचा प्रस्ताव दिला असेल, पण मंजूर झाला नाही तर काम कसे सुरू करणार. काम सुरू करण्यापूर्वी तांत्रिक, प्रशासकीय मान्यता लागते. - राजेश विशे, जि.प., पाणीपुरवठा समिती सदस्य>खराडे-बोंद्रेपाडा योजना राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.- आर.एम. आडे, कार्यकारी अभियंता, पंचायत समिती शहापूर