शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

बोईसरमध्ये महायुतीची बविआवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:55 IST

बवीआच्या हक्काच्या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने बहुजन विकास आघाडीची पीछेहाट झाली असून आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

- पंकज राऊतलोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये बोईसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना-भाजप युतीने २८ हजार १७२ मतांचे मताधिक्य मिळवून बवीआच्या हक्काच्या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने बहुजन विकास आघाडीची पीछेहाट झाली असून आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.लोकसभेच्या पालघर मतदार संघात पालघर, वसई, नालासोपारा, विक्रमगड, डहाणू व बोईसर अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर तर बोईसरचे आमदार विलास तरे असे तीन बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत.या तीन पैकी वसई विधानसभा व्यतिरिक्त नालासोपारा २४ हजार ६७० तर बोईसर मध्ये २८ हजार १७२ इतकी जास्त मते शिवसेना-भाजप महायुतिचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मिळाल्याने आपल्याच बालेकिल्ल्यात बविआची पीछेहाट झाली मात्र बवीआला पाठिंबा दिलेल्या माकपा, काँग्रेस राष्ट्रवादी व अन्य पक्ष संघटने मुळे डहाणू व विक्र मगड विधानसभा क्षेत्रात कधी न मिळालेले मताधिक्य बवीआला मिळाले ही जमेची बाजू आहे.बहुजनाचा विकास हाच प्रगतीचा प्रकाश हा उद्देश ठेवून बहुजन विकास आघाडी नेहमी राजकीय व सामाजिक क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी जिल्हास्तरीय पक्ष म्हणून २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकी पासून बहुजन विकास आघाडी कडे पाहिले जाते बविआची वसई विरार महानगरपालिकेवर प्रथम पासून मजबूत पकड असून बवीआचे आ. विलास तरे बोईसर विधानसभा मतदार संघाच्या २००९ च्या निवडणुकीत १३०७८ तर २०१४ च्या निवडणुकीमध्ये १२८७३ मताधिक्य मिळवून सलग दोन वेळा निवडून आले आहेत.पालघर लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत बवीआचे बळीराम जाधव १२३६० मताधिक्य ने निवडून आले होते तेव्हा बोईसर विधानसभा मतदार संघातून त्यांना ५७९१ मताधिक्य मिळाले होते मात्र त्या नंतर लोकसभेच्या २०१४,१८ (पोट निवडणूक) व २०१९ या दोन निवडणुकीत बोईसर विधानसभा मतदार संघातून बवीआला मताधिक्य मिळाले नव्हते. जनमनाचा व सर्वसामान्यांच्या समस्या व अडचणी चा कानोसा घेऊन त्यांच्या ज्वलंत प्रश्नावर विधानसभेत अनेक वेळा आ. तरे यांनी आवाज उठवला परंतु केलेल्या कामाची प्रसिद्धी तसेच प्रसारमाध्यमांचा वापर करून घेण्यात आलेले अपयश त्यामुळे केलेली कामे मतदारा पर्यंत पोहचत नसल्याने बविआची पिछेहाट झाली.।विलास तरेंना फाजील आत्मविश्वास नडलाआपला मतदारसंघ बविआचा बालेकिल्ला आहे. आपल्याला प्रसार माध्यमांची गरज नाही अशा भ्रमात तरे हे वावरत असतात. माध्यमांशी संवाद साधणे त्यांना कधीच पसंत नसते. माध्यमांना सहकार्य करणे तर त्यांच्या गावीही नसते. आप्पा सारे काही पाहून घेतील आपण काहीही करायची गरज नाही अशाच समजूतीत ते वावरतात. हीच बाब त्यांना लोकसभेला नडली. आता विधानसभेलाही नडण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.