शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

सहा तरुणांनी सार्थ ठरवला संरक्षण यंत्रणांचा विश्वास; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने समुद्रात बंद पडली ‘अग्निमाता’ बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 2:05 AM

या बोटीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. सातपाटीतील ज्ञानेश्वर तांडेल हे आपल्या मालकीची ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते.

हितेन नाईकपालघर : समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ले अथवा संशयित हालचालीवर लक्ष पुरविण्यासाठी आम्ही सक्षम असलो तरी आमचे खरे डोळे हे समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारच असल्याचा पुनरुच्चार संरक्षण यंत्रणांनी अनेक वेळा केला आहे. या देशाच्या संरक्षण यंत्रणांचा विश्वास सार्थ करून दाखविला तो सातपाटीमधील सहा धाडसी मच्छीमार तरुणांनी. सातपाटी बंदरातून गुरुवारी सकाळी समुद्रात मासेमारीला गेलेली ‘अग्निमाता’ ही बोट इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडली होती.

या बोटीला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश मिळाले आहे. सातपाटीतील ज्ञानेश्वर तांडेल हे आपल्या मालकीची ‘अग्निमाता’ ही बोट घेऊन गुरुवारी सकाळी ६ वाजता समुद्रात मासेमारीला गेले होते. त्यांच्या बोटीत दिलीप माणिक तांडेल, जगन्नाथ लक्ष्मण तांडेल आणि प्रवीण पांडुरंग धनू हे मच्छीमार होते. सकाळी मासेमारीला जाऊन संध्याकाळी पुन्हा किनाऱ्यावर येणारी बोट शुक्रवारीही आली नसल्याने त्या सर्वांचे कुटुंबीय काळजीत पडले होते. याबाबत सातपाटी सागरी पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर यांनी या बेपत्ता बोटीबाबत कोस्टगार्ड, नेव्ही, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आदींसह जिल्ह्यातील ११२ किमीवरील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना कळवीत स्वतः या घटनेकडे लक्ष पुरवत होते.

तीन दिवस झाले तरी त्या बोटीचा आणि मच्छीमारांचा शोध लागत नव्हता. शनिवारी सकाळी सातपाटी येथील चार बोटी त्यांच्या शोधार्थ समुद्रात गेल्यानंतर महालक्ष्मी प्रसादमधील मच्छीमारांना एडवन भागात ‘अग्निमाता’ बोट उभी असल्याचे दिसले. बोटीच्या इंजिनमधील क्रांक शॉप तुटल्याने ते अडकून पडल्याचे त्या बोटीतील मच्छीमारांनी सांगितले.

आम्हाला घराची ओढ लागल्याने किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी बोटीला शीड लावून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुद्ध बाजूने वाऱ्याचा वेग असल्याने आम्ही अपयशी ठरत होतो, असे बोटीचे मालक ज्ञानेश्वर तांडेल यांनी सांगितले. आम्ही मदतीसाठी देवाचा धावा करीत असताना आमचे मच्छीमार बांधव मदतीला धावून आले. त्यांनी शनिवारी दुपारी किनारा गाठल्यानंतर उपस्थित कुटुंबीयांनी त्यांना गच्च मिठ्या मारून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. या वेळी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. सपोनि दहाळकर यांनी सर्व सुखरूप आलेल्या मच्छीमारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

प्यायला पाणी नाहीआजूबाजूने जाणाऱ्या अनेक बोटींना मदतीसाठी हाका मारूनही कोणी मदतीसाठी धावून आले नाही. तीन दिवसांपासून अडकलो असताना साधे पिण्याचे पाणीही मिळाले नसल्याचे सांगून काही माणसांतल्या संवेदना इतक्या बोथट झाल्याचे पाहून रडायला आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.