शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

By नितीन पंडित | Updated: September 30, 2023 21:46 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : देशातील छोटे उद्योग डबघाईला आले असून शेतकरी,कामगार,युवकांचे असंख्ये प्रश्न आजही प्रलंबित असून राज्यात बेरोजगारीची समस्या गंभीर बनली असतांनाच मागील दहा वर्षांच्या काळात छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकारने केले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.भिवंडीत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बुनकर संमेलनाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी पटोले शनिवारी भिवंडीत आले होते. यावेळी काँग्रेस मध्यवर्ती शहर कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  भिवंडीत आयोजित केलेल्या काँग्रेसच्या या बुनकर मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. त्यानंतर पटोले यांनी सभेचे आयोजन होणाऱ्या टावरे स्टेडियमची पाहणी केली.

त्यानंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला. राज्यातील शिंदे सरकारने दीड वर्षांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला नसून राज्यातील जवळपास १७ मंत्री पदे रिक्त असल्याने एका एका मंत्राकडेच पाच ते सहा खाती असल्याने सामान्य नागरिकांचे मूळ प्रश्न सुटत नसल्याची टीकाही यावेळी पटोले यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांबाबत विचारले असता, भाजप सरकार जुमले करण्यात एक्सपर्ट असून ही वाघ नखे नक्की खरी की खोटी याचे निष्कर्ष कोण काढणार असा सवाल पटोले यांनी उपस्थित करत राज्यात कंत्राटी भरती करून युवकांच्या जीवाशी खेळ सुरू केला असून राज्यात कंत्राट भरती नको उलट सरकारी नोकर भरती करणे गरजेचे असून युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही असा इशारा देखील पटोले यांनी यावेळी शिंदे फडणवीस पवार सरकारला दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपा