शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकार करतेय; नाना पटोलेंची टीका

By नितीन पंडित | Updated: September 30, 2023 21:46 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : देशातील छोटे उद्योग डबघाईला आले असून शेतकरी,कामगार,युवकांचे असंख्ये प्रश्न आजही प्रलंबित असून राज्यात बेरोजगारीची समस्या गंभीर बनली असतांनाच मागील दहा वर्षांच्या काळात छोट्या उद्योगांना संपविण्याचे काम भाजप सरकारने केले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.भिवंडीत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बुनकर संमेलनाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी पटोले शनिवारी भिवंडीत आले होते. यावेळी काँग्रेस मध्यवर्ती शहर कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

  भिवंडीत आयोजित केलेल्या काँग्रेसच्या या बुनकर मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार असल्याची माहिती पटोले यांनी दिली. त्यानंतर पटोले यांनी सभेचे आयोजन होणाऱ्या टावरे स्टेडियमची पाहणी केली.

त्यानंतर काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेबरोबरच भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास यावेळी पटोले यांनी व्यक्त केला. राज्यातील शिंदे सरकारने दीड वर्षांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला नसून राज्यातील जवळपास १७ मंत्री पदे रिक्त असल्याने एका एका मंत्राकडेच पाच ते सहा खाती असल्याने सामान्य नागरिकांचे मूळ प्रश्न सुटत नसल्याची टीकाही यावेळी पटोले यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांबाबत विचारले असता, भाजप सरकार जुमले करण्यात एक्सपर्ट असून ही वाघ नखे नक्की खरी की खोटी याचे निष्कर्ष कोण काढणार असा सवाल पटोले यांनी उपस्थित करत राज्यात कंत्राटी भरती करून युवकांच्या जीवाशी खेळ सुरू केला असून राज्यात कंत्राट भरती नको उलट सरकारी नोकर भरती करणे गरजेचे असून युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही असा इशारा देखील पटोले यांनी यावेळी शिंदे फडणवीस पवार सरकारला दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपा