शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

गांधी जयंतीनिमित्त डहाणूत साकारले बापूंचे वाळूशिल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 23:37 IST

१५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

डहाणू/बोर्डी - १५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तर चिखले-घोलवडच्या विजयवाडी किनाऱ्यावर महात्मा गांधीजींचे उभे वाळूशिल्प आणि भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह साकारले होते. डहाणू विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते या कार्यक्र माचे उद्घाटन झाले. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केल्यानंतर सामूहिक स्वच्छता आणि मतदान जनजागृतीबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली. तर लोकशाही उत्सवाचे पथनाट्य जिल्हा परिषद शिक्षकांच्या पथकाने सादर केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना प्लास्टिक बंदीचा संदेश देताना कापडी पिशव्यांचे वाटप केले.डहाणूत नागरिक स्वयंप्रेरणेने जमिनीवरील तसेच सागरी जैवविविधता टिकविण्यासाठी २०१२ सालापासून कांदळवन स्वच्छतेचे कौतुकास्पद कार्य करीत आहेत. आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन सौरभ कटियार यांनी केले.कांदळवानांचे महत्त्व अधोरेखित करून त्याच्या संवर्धनाकरिता स्थानिकांचा जोश स्फूर्र्तिदायक असल्याचे गौरवोद्गार उपवन संरक्षक भिसे यांनी काढले. तर तालुक्यात तटरक्षक दलाकडून किनारा स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याची माहिती या दलाचे कामांडंट संतोष नायर यांनी दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हा हक्क बजावयालाच हवा असे आवाहन यावेळी भारताचा दिव्यांग क्रि केट संघाचा कर्णधार आणि पालघर जिल्हा विशेष मतदार जागृती दूत विक्र ांत केणी यांनी केले. त्याला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.या उपक्र मात भारतीय तटरक्षक दल, पोलीस, वन विभाग, जि.परिषद प्राथमिक शाळा आणि रुस्तमजी अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी, वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि स्थानिक सहभागी होते. यावेळी उपवन संरक्षक भिसे, तटरक्षक दलाचे कामांडंट संतोष नायर, तहसीलदार राहुल सारंग, दिव्यांग विश्व चषक विजेता भारतीय कर्णधार विक्र ांत केणी यांची प्रमुख उपस्थिती होती.गांधीजींच्या वाळूशिल्पाची प्रशंसादक्षिण भारताप्रमाणेच उभे वाळूशिल्प साकारण्याची दुर्मिळ कला या जिल्ह्यात बोर्डीतील भास्कर दमणकर यांना अवगत आहे. १५० व्या गांधी जयंतीला बापूंचे ध्यानस्थ अवस्थेतील सहाफूट उंचीचे शिल्प त्यांनी पाच तासांच्या काळात निर्मिले. त्याची प्रशंसा झाली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीVasai Virarवसई विरार