शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गांधी जयंतीनिमित्त डहाणूत साकारले बापूंचे वाळूशिल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 23:37 IST

१५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

डहाणू/बोर्डी - १५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तर चिखले-घोलवडच्या विजयवाडी किनाऱ्यावर महात्मा गांधीजींचे उभे वाळूशिल्प आणि भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह साकारले होते. डहाणू विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते या कार्यक्र माचे उद्घाटन झाले. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केल्यानंतर सामूहिक स्वच्छता आणि मतदान जनजागृतीबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली. तर लोकशाही उत्सवाचे पथनाट्य जिल्हा परिषद शिक्षकांच्या पथकाने सादर केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना प्लास्टिक बंदीचा संदेश देताना कापडी पिशव्यांचे वाटप केले.डहाणूत नागरिक स्वयंप्रेरणेने जमिनीवरील तसेच सागरी जैवविविधता टिकविण्यासाठी २०१२ सालापासून कांदळवन स्वच्छतेचे कौतुकास्पद कार्य करीत आहेत. आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन सौरभ कटियार यांनी केले.कांदळवानांचे महत्त्व अधोरेखित करून त्याच्या संवर्धनाकरिता स्थानिकांचा जोश स्फूर्र्तिदायक असल्याचे गौरवोद्गार उपवन संरक्षक भिसे यांनी काढले. तर तालुक्यात तटरक्षक दलाकडून किनारा स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याची माहिती या दलाचे कामांडंट संतोष नायर यांनी दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हा हक्क बजावयालाच हवा असे आवाहन यावेळी भारताचा दिव्यांग क्रि केट संघाचा कर्णधार आणि पालघर जिल्हा विशेष मतदार जागृती दूत विक्र ांत केणी यांनी केले. त्याला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.या उपक्र मात भारतीय तटरक्षक दल, पोलीस, वन विभाग, जि.परिषद प्राथमिक शाळा आणि रुस्तमजी अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी, वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि स्थानिक सहभागी होते. यावेळी उपवन संरक्षक भिसे, तटरक्षक दलाचे कामांडंट संतोष नायर, तहसीलदार राहुल सारंग, दिव्यांग विश्व चषक विजेता भारतीय कर्णधार विक्र ांत केणी यांची प्रमुख उपस्थिती होती.गांधीजींच्या वाळूशिल्पाची प्रशंसादक्षिण भारताप्रमाणेच उभे वाळूशिल्प साकारण्याची दुर्मिळ कला या जिल्ह्यात बोर्डीतील भास्कर दमणकर यांना अवगत आहे. १५० व्या गांधी जयंतीला बापूंचे ध्यानस्थ अवस्थेतील सहाफूट उंचीचे शिल्प त्यांनी पाच तासांच्या काळात निर्मिले. त्याची प्रशंसा झाली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीVasai Virarवसई विरार