शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

विना ओसी इमारतींवर बडगा, वसई महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 02:47 IST

वसई महापालिकेचा निर्णय : हे तर, चोर सोडून संन्याशाला फाशी - भाजप

पारोळ : वसई-विरार महापालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी वसई-विरार शहरातील ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नाही त्या इमारतीमधील रहिवाशांना शास्ती आकारण्यास सुरवात केल्याची माहिती नगर रचना विभाग प्रमुख संजय जगताप यांनी नुकतीच दिली, हा सर्व प्रकार केवळ संतापजनक नाही तर बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांकडून फसवणूक झालेल्या लाखो रहिवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.

या महापालिका क्षेत्रामधील बहुसंख्य सदनिकाधारकांची बांधकाम व्यावसायिक आणि विकासक यांनी अधिकृत बांधकामाच्या नावाखाली फसवणूक केली आहे. भोगवटा पत्र नसताना किंवा पार्ट ओसी (भोगवटा पत्र) घेऊन लोकांना सदनिकांमध्ये राहण्यास भाग पाडले. महापालिकेकडून त्या सदनिकांना अधिकृत घरपट्टी, नळ जोडणी तसेच महावितरणकडून वीज जोडणी सुद्धा मिळवून दिली आणि आता महापालिका अशा रहिवाशांना शास्ती लावत आहेत. ही प्रचंड बाब आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार असून बांधकाम व्यावसायिक, विकासक, वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) आणि महापालिका अधिकऱ्यांना वाचविण्यासाठी सामान्य रहिवाशांचा बळी महापालिका प्रशासन देत आहे, असा आरोप भाजपने केला आहे

बांधकाम परवाना देणे आणि भोगवटा पत्र देणे, या पलीकडे नगर रचना विभागाचे काहीच काम नाही का? एकदा बांधकाम परवा दिला आणि केवळ जोते प्रमाणपत्र दिले कि नगर रचना विभाग किंवा महापालिका अधिकारी त्या बांधकामाकडे ढुंकून ही बघत नाहीत, कितीही तक्रारी केल्या तरी कागदी घोडे नाचवण्यापलीकडे महापालिका प्रशासन काही करत नाही, आणि मग महापालिका अधिकाºयांच्या आशिर्वादाने विकासक मनमानी बांधकाम करून सदनिका धारकांना ते अधिकृत भासवून राहण्यासाठी देत आहेत. इतर महापालिकां प्रमाणे प्रत्येक माळा तसेच प्रत्यके टप्प्यामध्ये त्याची तपासणी होऊन परवान्याप्रमाणे काम होते आहे कि नाही, हे बघण्याची जबाबदारी नगर रचना विभागाची आहे परंतु आपली जबाबदारी नीट पूर्ण न करता सर्वसामान्यांना वेठीस धरणाºया महापालिकेने प्रथम अनधिकृत बांधकामे करणारे बिल्डर, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना सहकार्य करणारे आर्किटेक्ट, महापालिका व नगररचना विभागाचे अभियंता व नगररचना विभागाचे , भोगवटा प्रमाणपत्र नसतांना नियमीत घरपट्टी लावणारे, भोगवटा पत्र नसताना नळ जोडणी देणारे अधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार आहे तसेच या सर्वांवर गुन्हे कधी दाखल होणार याचा तपशील द्यावा. या सर्वाना पाठीशी घालणारे नगररचना अधिकारी व महापालिका अधिकारी याच्यावर कारवाई कधी होणार?*चोर सोडून सामान्य करदात्याला छळण्याचा हा प्रकार महापालिकेच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत असेल तर महापालिकेने बिल्डर, आर्किटेक्ट महापालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करून दाखवी आणि मगच सदनिकाधारकाला बांधकाम नियमित करण्यासाठी दंड ठोठवावा.-मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार