शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

निवडणूक काळात घेतली योग्यता चाचणी परीक्षा; मीरा-भाईंदर पालिकेकडे मागवला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 07:25 IST

आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता चाचणी परीक्षा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या कामात एकीकडे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याचे सांगून नागरिकांच्या तक्रारींवर टोलवाटोलवी करणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेने ऐन निवडणुकीच्या काळात योग्यता चाचणी परीक्षा घेतली. त्यावर आयोगाने पालिकेकडे खुलासा मागवला असता पालिकेने मात्र आचारसंहितेचा भंग नसल्याचे कळवले आहे.

अभियंत्यांना निवडणूक कामी नेमण्यात आले आहे. निवडणुकीचे काम आणि कार्यालयीन काम असताना दुसरीकडे महापालिकेने या ४६ कनिष्ठ अभियंत्यांची योग्यता चाचणी परीक्षा २६ एप्रिल रोजी घेतली. वास्तविक निवडणुकीचे काम असल्याने चाचणी परीक्षा नंतर घ्यावी, अशी विनंती अभियंत्यांनी केली होती. इतकेच काय, ते अनेकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदींनादेखील पत्र दिले होते. परीक्षेसाठी अभ्यास करण्याकरिता तसेच निवडणूक आणि पालिका कामातून वेळ मिळावा, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्रानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आयुक्तांना २२ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये ॲटिट्यूड टेस्ट  ४ जूननंतर घ्यावी म्हणून कळवले. परंतु, पालिकेने त्या पत्राला न जुमानता परीक्षा घेतली. आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता चाचणी परीक्षा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. 

महापालिकेने त्यांच्या अधिनस्त असलेल्या स्थायी वा अस्थायी कर्मचाऱ्यांची योग्यता चाचणी घेणे म्हणजे आचारसंहितेचा भंग होत नाही. हा पालिकेच्या कामकाजाचा हा भाग आहे. त्यामुळे आयोगालादेखील याबाबतचा अहवाल दिला असून आचारसंहिता भंग झाला नसल्याचे कळवले आहे.- रवी पवार, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक