शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अप्पर पोलीस अधिक्षकांना अ‍ॅट्रोसिटी लावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 05:04 IST

शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक

हितेन नाईक

पालघर : शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिलायन्स कंपनीची गॅसपाईप लाइन टाकण्याच्या कामाची योग्य भरपाई मिळावी अशी, न्याय्य मागणी करणाºया बिलोशी येथील दलित शेतकºयांना मारहाण करणाºया अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.गुजरातच्या दाहेज येथून नागोठणे येथे जाणारी गॅस पाईपलाइन पालघर जिल्हयातून जात असून २५ आॅगस्ट रोजी वाडा तालुक्यातील बिलोशी गावातून काही शेतकºयांच्या सुपीक जमिनी मधून जात असतांना तेथे उपस्थित शेतकºयांशी अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. त्यांनी शेतकरी मुनिराज गायकवाड ह्यांच्या श्रीमुखात लगावली आणि अन्य १२ शेतकºयां विरोधात सरकारी कामात अडथळा आणला व हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असे गुन्हे दाखल केले. हे सर्व शेतकरी सध्या तुरु ंगात आहेत.

आज सेनेचे आ. रवींद्र फाटक, आ.अमित घोडा, सहसंपर्क प्रमुख श्रीनिवास वनगा, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, पालघर विधानसभा प्रमुख वैभव संखे, तालुकाध्यक्ष विकास मोरे, उपतालुका प्रमुख निलम संखे, जि.प. उपाध्यक्ष निलेश गंधे, सभापती ज्योती मेहेर, ज्योती ठाकरे आदींनी बाधित शेतकºयांच्या नातेवाईकांसह उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुने ह्यांची भेट घेऊन निवेदन दिले.रिलायन्सच्या पाईपलाईनचे काम हे खाजगी असतांनाही जिल्हाधिकारी आणि पोलीस रिलायन्सचे नोकर असल्या प्रमाणे काम करीत असल्याचा आरोप आ. फाटक ह्यांनी केला. नुकसान भरपाई मध्ये विसंगती असून जो जास्त विरोध करतो त्याला जास्त भरपाई दिली जाते असे फाटक यांनी सांगितले.पोलिसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत ह्या साठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून तात्काळ गुन्हे मागे न घेतल्यास सेनेच्या वतीने आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला.बिलोशी गावात पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे अनेक घरात चार दिवसांपासून चूलच पेटली नसून संपूर्ण गाव दहशतीखाली वावरत असल्याचे अटक केलेल्या गायकवाड यांची पत्नी मनीषा गायकवाड ह्यांनी पत्रकारांना सांगितले. अटकसत्रा नंतर पोलीस बंदोबस्तात पाईपलाईन टाकण्याचे काम पोलिसांनी जबरदस्तीने पहाटेपर्यंत करून घेतल्याचा आरोप ह्यावेळी बाधित कुटुंबियानी केला. आम्हा दलित समाजाच्या १३ पैकी ११ लोकांवर अधीक्षक चव्हाण यांनी आकसाने कारवाई केली असून त्यांच्यावर आणि रिलायन्स पाईपलाईनचे काम करणारा दलाल आणि भाजप कार्यकर्ता योगेश पाटील यांच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनीषा गायकवाड ह्यांनी केली आहे.रिलायन्स पाईपलाईन बाबत अनेक दलालांनी मोठी रक्कम घेतली असून ती एकित्रत रक्कम जमा करून ती बाधित शेतकर्यांना दिली असती तर शेतकर्यांनी स्वखुशीने आपल्या जमिनी रिलायन्सला दिल्या असत्या.- निलेश सांबरे,सामाजिक कार्यकर्ता, झडपोली

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिसAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा