शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खाकीतील अंबिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:57 IST

दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमात तहसीलदारांच्या भाषणाने तामिळनाडूच्या खेड्यात सामान्य कुटुंबात जन्मलेली एक विद्यार्थिनी प्रभावित झाली. स्पर्धा परीक्षा, देशसेवेच्या ध्येयाने तिच्या कोवळ्या मनात घर केले. महाविद्यालयात असतानाच लग्न झाले, पाहता पाहता दोन गोंडस मुले झाली. संसाराची जबाबदारी पार पाडत असतानाच तिला ध्येय खुणावत होते. प्रवास खडतर होता. पण विचलित न होता, नेटाने प्रयत्न करून २००९ मध्ये तिने ध्येय गाठलेच. तिचे नाव आहे आयपीएस अधिकारी एन. अंबिका.

- मनीषा म्हात्रेएन. अंबिका यांचा जन्म तामिळनाडूच्या खेड्यातील. दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या तहसीलदारांच्या भाषणाने त्या प्रभावित झाल्या. भविष्यात सरकारी सेवेत रुजू होऊन समाजासाठी काहीतरी करायचे, असे त्यांनी त्याचक्षणी ठरवले. पुढे कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांचे लग्न झाले.

घर, संसार सांभाळतानाच अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पतीनेही पाठिंबा दिला. दरम्यान, मुलगा झाला. तरीही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. पहिल्यांदा अपयश आले. पुन्हा तयारी सुरू केली. परंतु, अपयश पाठ सोडेना! त्यादेखील जिद्दी होत्या. त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, दुसरा मुलगा झाला. संसार, लहानग्यांचे संगोपन आणि स्पर्धा परीक्षा... अशी तारेवरची कसरत सुरूच होती. अखेर मेहनतीला यश आले. पाचव्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. त्या वेळी एक मुलगा पाच वर्षांचा तर दुसरा वर्षाचा होता. २००९ मध्ये त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. अकोला, हिंगोली, नाशिकमध्ये कर्तव्य बाजावल्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या परिमंडळ ४च्या उपायुक्त पदाची जबाबदारी आली. दोन वर्षांपासून त्या ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. अलीकडेच शहरात गणेशोत्सव पार पडला. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. गर्दीत चोरी, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक आघाड्यांवर वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या साथीने अंबिका यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कधीकाळी परिमंडळ ४मध्ये सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना घडायच्या. अंबिका यांनी अचूक व्यूहरचना आखली. गस्त, बंदोबस्ताची पद्धत बदलली. आरोपी लवकर पकडले जावेत, चोरी मुद्देमाल ज्याचा त्याला परत मिळावा, यासाठी धडपड सुरू असते, असे अंबिका यांनी सांगितले. महिला घराचीच नव्हे, तर देशाच्या संरक्षणाची जबाबदारीही सक्षमपणे पेलू शकतात, हे अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.महिलांनो, सक्षम व्हा. हिंमत हरू नका. अत्याचार सहन करू नका. कोणत्याही अडचणींबाबत कुरबूर न करता त्यावर मात करत पुढे चला. ठरवले तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. फक्त ध्येय पक्के हवे, मन खंबीर हवे आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी हवी. मग पाहा, अशक्यही सहज शक्य करता येते.

टॅग्स :Lokmatलोकमत