शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

खाकीतील अंबिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:57 IST

दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमात तहसीलदारांच्या भाषणाने तामिळनाडूच्या खेड्यात सामान्य कुटुंबात जन्मलेली एक विद्यार्थिनी प्रभावित झाली. स्पर्धा परीक्षा, देशसेवेच्या ध्येयाने तिच्या कोवळ्या मनात घर केले. महाविद्यालयात असतानाच लग्न झाले, पाहता पाहता दोन गोंडस मुले झाली. संसाराची जबाबदारी पार पाडत असतानाच तिला ध्येय खुणावत होते. प्रवास खडतर होता. पण विचलित न होता, नेटाने प्रयत्न करून २००९ मध्ये तिने ध्येय गाठलेच. तिचे नाव आहे आयपीएस अधिकारी एन. अंबिका.

- मनीषा म्हात्रेएन. अंबिका यांचा जन्म तामिळनाडूच्या खेड्यातील. दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या तहसीलदारांच्या भाषणाने त्या प्रभावित झाल्या. भविष्यात सरकारी सेवेत रुजू होऊन समाजासाठी काहीतरी करायचे, असे त्यांनी त्याचक्षणी ठरवले. पुढे कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांचे लग्न झाले.

घर, संसार सांभाळतानाच अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पतीनेही पाठिंबा दिला. दरम्यान, मुलगा झाला. तरीही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. पहिल्यांदा अपयश आले. पुन्हा तयारी सुरू केली. परंतु, अपयश पाठ सोडेना! त्यादेखील जिद्दी होत्या. त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, दुसरा मुलगा झाला. संसार, लहानग्यांचे संगोपन आणि स्पर्धा परीक्षा... अशी तारेवरची कसरत सुरूच होती. अखेर मेहनतीला यश आले. पाचव्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. त्या वेळी एक मुलगा पाच वर्षांचा तर दुसरा वर्षाचा होता. २००९ मध्ये त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. अकोला, हिंगोली, नाशिकमध्ये कर्तव्य बाजावल्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या परिमंडळ ४च्या उपायुक्त पदाची जबाबदारी आली. दोन वर्षांपासून त्या ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. अलीकडेच शहरात गणेशोत्सव पार पडला. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. गर्दीत चोरी, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक आघाड्यांवर वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या साथीने अंबिका यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कधीकाळी परिमंडळ ४मध्ये सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना घडायच्या. अंबिका यांनी अचूक व्यूहरचना आखली. गस्त, बंदोबस्ताची पद्धत बदलली. आरोपी लवकर पकडले जावेत, चोरी मुद्देमाल ज्याचा त्याला परत मिळावा, यासाठी धडपड सुरू असते, असे अंबिका यांनी सांगितले. महिला घराचीच नव्हे, तर देशाच्या संरक्षणाची जबाबदारीही सक्षमपणे पेलू शकतात, हे अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.महिलांनो, सक्षम व्हा. हिंमत हरू नका. अत्याचार सहन करू नका. कोणत्याही अडचणींबाबत कुरबूर न करता त्यावर मात करत पुढे चला. ठरवले तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. फक्त ध्येय पक्के हवे, मन खंबीर हवे आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी हवी. मग पाहा, अशक्यही सहज शक्य करता येते.

टॅग्स :Lokmatलोकमत