शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

सर्वेक्षणानंतर हवेची गुणवत्ता सुधारली? तारापूर एमआयडीसीतील उद्योगांत कारवाईची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:40 IST

Tarapur MIDC News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत तारापूर एमआयडीसीतील उद्योगांची पर्यावरणाच्या संदर्भात तपासणी (सर्वेक्षण) सुरू करताच तारापूरच्या हवेच्या गुणवत्तेत हळूहळू काहीशी सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे.

- पंकज राऊत बोईसर - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत तारापूर एमआयडीसीतील उद्योगांची पर्यावरणाच्या संदर्भात तपासणी (सर्वेक्षण) सुरू करताच तारापूरच्या हवेच्या गुणवत्तेत हळूहळू काहीशी सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे. आम्हाला चांगली, दुर्गंधी आणि वासविरहित शुद्ध हवा मिळण्यासाठी हे असे सर्वेक्षण कायमस्वरूपी सुरू ठेवावे, अशी मागणी आता येथील नागरिक करू लागले आहेत.तारापूरच्या हवा आणि जलप्रदूषणात प्रचंड वाढ झालेली असून यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवत आहेत. मात्र सध्या सर्वेक्षण सुरू असून यादरम्यान प्रदूषण कमी होऊन हवेत सुधारणा होत आहे. तारापूर येथील तपासणी झालेल्या उद्योगांमधील सांडपाणी आणि हवेच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत पृथ्थकरण करून पर्यावरणाच्या मापदंडकानुसार पडताळणी होणार असून तपासणीत जे दोषी आढळतील त्या उद्योगांवर कारवाई करण्यात येणार आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर तसेच खंबीर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.९ डिसेंबरपर्यंत १९१ उद्योगांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कारवाईच्या भीतीपोटी उद्योगांमध्ये पर्यावरणाच्या नियमांची अंमलबजावणी होत असल्याने हवेत सुधारणा होत आहे. मात्र प्रत्येक उद्योगाला म.प्र. नि.मंडळाने दिलेल्या अटी व शर्तींबरोबरच उत्पादन व इतर सामग्रीचा खर्च वाचविण्यासाठी दिलेले नियम पायदळी तुडवत असल्याचे निदर्शनास येणाऱ्या उद्योगांवर कारवाई होणार आहे. तसेच सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी व आता यादरम्यान हवेत किती सुधारणा झाली याचा अहवालही राष्ट्रीय हरित लवादाकडे सुपूर्द केल्यास खरे चित्र समोर येईल.माहिती देणारा फलक धूळ खातमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवर हवेची गुणवत्ता तापसणाऱ्या स्टेशनमधील अद्ययावत तंत्राद्वारे पीएम २.५(हवेतील तरंगणारे धूलिकण पीएम २.५ मायक्रोन), पीएम १० (हवेतील तरंगणारे धूलिकण १० मायक्रॉन), सीओ (कार्बन मोनोऑक्साईड ), एस ओ २ (नायट्रोजन डाय ओक्सईड), एस ओ २ (सल्फर डायोक्ससाईड) इत्यादींचे प्रमाण मोजून हवेची गुणवत्ता तपासून त्याची माहिती कार्यालयाबाहेरील फलकावर लिहिण्यात येत होती. दुर्दैवाने तो फलक आज धूळखात पडला आहे.सध्या म.प्र.मंडळाच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक तारापूर औद्योगिक क्षेत्रात सर्वेक्षण करीत आहे. तसेच कुठलाही अधिकारी कधीही उद्योगास भेट देऊ शकतो ही भीती असावी यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे.- डॉ. राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, म.प्र.नि. मंडळ, ठाणे विभाग. तारापूर एमआयडीसीतील वातावरण काहीसे सुधारलेले जाणवत आहे. घाण वास कमी झाला आहे. फक्त सर्वेक्षणदरम्यान सुधारणा नको, तर ती कायमस्वरूपी असावी.    - डॉ. सूर्यकांत संखे, अध्यक्ष, सिटिझन्स फोरम बोईसर.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार