शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला शिवशाहीचा वातानुकूलित धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 15:49 IST

महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका

भार्इंदर :  महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. 

पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाकडुन या मार्गावर एकुण सहा बस चालविल्या जातात. त्यापैकी ४ बस भार्इंदर (प) तर २ बस मीरारोड पुर्व रेल्वे स्थानक परिसरातून सोडल्या जातात. भार्इंदर (प) ते ठाणे (कोपरी) दरम्यान साधारण व वातानुकूलित प्रत्येकी २ बस तर मीरारोड येथून २ वातानुकूलित बस सोडल्या जातात. यातील साधारण बसचे कोपरी पर्यंतचे भाडे प्रत्येकी ३० रुपये तर वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे प्रत्येकी १०० रुपये आहे. भार्इंदर येथून सकाळी ६.४० ते सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान साधारण बस सोडल्या जातात. तर वातानुकूलित बसची सेवा सकाळी ७.५० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान सुरु ठेवली जाते.  मीरारोडहुन वातानुकूलित बस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सेवा देतात. दोन बसच्या सेवेतील अंतर अर्धा तासाचे असले तरी या मार्गावर सुमारे १ हजार २०० ते दिड हजार प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. यातून परिवहन विभागाला दिवसामागे सुमारे ६५ हजार रुपयांहून अधिक उत्पन्न प्राप्त होत असल्याने ते इतर मार्गाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. या मार्गावर इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेद्वारे दिवसाला १० ते १५ हजार प्रवासी दररोज प्रवास करीत असल्याने हा मार्ग सार्वजनिक वाहतुक विभागांसाठी फायदेशीर मानला जातो. हा फायदा गृहित धरुन एसटीने दोन दिवसांपासुन भार्इंदर पश्चिम बस स्थानकातून १२ शिवशाही वातानुकूलित बस सुरु केल्या आहेत. या बसची सेवा भार्इंदर (प) ते ठाणे पश्चिम पर्यंत विनावाहक असल्याने या मार्गादरम्यानच्या प्रवाशांना मात्र त्यातून प्रवास करता येत नाही. या बसची सेवा सकाळी ७.५० ते रात्री १२.३० पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली असुन त्याचे प्रवासी भाडे देखील ४८ रुपये एवढे माफक ठेवण्यात आले आहे. या बसची सेवा थेट असल्याने बसस्थानकातून निघणाऱ्या बसची विनाथांबा जलद सेवा प्रवाशांना भुरळ पाडू लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाच्या वातानुकूलित सेवेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासुन त्याचा परिणाम अद्याप स्थानिक परिवहनच्या वातानुकूलित सेवेवर झाला नसल्याचे विभागाकडुन सांगण्यात येत असले तरी भविष्यात मात्र तो होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे स्थानिक परिवहन सेवेच्या बसमधून प्रवाशांना शिवशाहीकडे वळण्यापासुन रोखण्यासह परिवहन विभागाचे उत्पन्न कायम ठेवण्यासाठी प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडुन प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे मत विभागातील कर्मचाऱ्यांकडुन व्यक्त केले जात आहे.

एसटीच्या शिवशाहीची स्पर्धा करुन स्थानिक परिवहन सेवा ठाणे मार्गावर भरीव उत्पन्नावर कशी सुरु ठेवता येईल. तसेच हि सेवा पर्यायी व फायदेशीर ठरणाऱ्या  मार्गावर वळविण्याबाबत स्थानिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. 

टॅग्स :ShivshahiशिवशाहीMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक