शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

अहमदाबाद महामार्ग झाला इन्फर्नो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:14 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे.

- शशिकांत ठाकूर कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे. त्याला कायदा आणि नियम धाब्यावर बसविण्याची वृत्ती जशी जबाबदार आहे त्याचप्रमाणे एकदा वसई सोडले की, मार्गात कुठेही अग्निशमन यंत्रणा निर्माण न करण्याची बेफिकीरीही कारणीभूत आहे.गेल्या महिन्यात ओव्हरलोड भरलेल्या गवताच्या भाºयांच्या संपर्कात वीजवाहक तारा आल्याने चार ट्रकला आग लागली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. परंतु वित्तहानी मोठी झाली. त्यापाठापाठ मंगळवारी हायड्रोजनच्या ट्रंकरला आग लागली. त्यात एकाचा जीव गेला तर तीन जखमी झाले. याला कारण वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गवत अथवा माल भरणे, त्याची उंची निर्धारित उंचीपेक्षा जास्त ठेवणे, लोंबणाºया विजवाहकतारा या ताणून न बांधणे ही कारणे जशी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे आपला पेट्रोलपंप अथवा हॉटेल याचा धंदा जोरात व्हावा यासाठी महामार्गाचा डिव्हायडर तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेणे.असे प्रकारही कारणीभूत आहेत. ज्या महामार्गावर वाहनांची गती ताशी शंभर कि.मी वा त्याच्या जवळपास असते त्यावर क्रॉसिंग शक्यतो नसावेत हा संकेत आहे. महामार्गा तसाच बांधला आहे. परंतु अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर वेगाने येणारे वाहन ओलांडणाºया वाहनावर धडकते हा नेहमीचा अनुभव आहे. अनेकदा असे तोडलेले डिव्हायडर पुन्हा पूर्ववत केले ते परत तोडले जातात . त्यामुळेही अपघात होतात. वसई सोडल्यानंतर ज्याच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे असे एकही दल नाही. जेथे त्या आहेत तेथील बंब येईपर्यंत तासन्तास निघून जातात. यावर तोडगा निघेपर्यंत हे अपघात सुरूच राहतील.>सुसज्ज दल आवश्यकडहाणूमधील वीजप्रकल्प आणि तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक रसायनांची वाहतूक करणारे हजारो टँकर अशी स्थिती असतांना महामार्गालगत तळ असलेली आधुनिक यंत्रणा असलेले अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी सरकार सतत दुर्लक्षित आलेले आहे. ती तातडीने पूर्ण होण्याची असलेली आवश्यकता या अपघातामुळे मंगळवारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशी चर्चा स्थानिकात सुरू आहे.