शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:37 IST

किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे.

- अनिरुध्द पाटीलबोर्डी - किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे हा बैलांचा सौदा करण्याची पद्धती शेतीला पूरक असून दोन्ही शेतकरी कुटुंबाकरिता फायदेशीर ठरत आहे. यंदा एका बैलाचा मोबदला दोन हजार रु पये आहेत.तालुक्यात खरीप हंगामातील भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून तालुक्यातील शेतीचे समुद्रकिनाºयालगत आणि डोंगरीपट्यातील अशी ढोबळमानाने दोन प्रकारची वर्गवारी करण्यात येते. किनाºयालगतची जमीन सपाट असल्याने चिखलणीसाठी पूर्वी बैलांचा तर हल्ली पॉवर टीलरचा वापर केला जातो तर डोंगराळ भागात खडकाळ आणि उतरणीची जमीन असल्याने येथे यांत्रिक शेतीला मर्यादा असून आजही बैलांच्या माध्यमातून शेती होते.दरम्यान पावसाळ्यात किनारी भागात पेरणी आणि लावणी वगळता बैलांचा वापर होत नाही. शिवाय शेत व पाणथळ जमिनीमुळे जनावरांकरिता गुरचरणाकरिता मर्यादा येतात. त्यांच्या संगोपनाकरिता मनुष्यबळ, वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. त्यामुळे शेतीला आवश्यक जनावरांच्या व्यतिरिक्त अन्य जनावरांचे संगोपन करणे हा शेतकºयांपुढे प्रश्न असतो. उलटपक्षी डोंगरी भागात खाद्याची मुबलकता अधिक असून त्यांना बैलांची आवश्यकता असते. त्यामुळे किनारपट्टीतील शेतकºयांचे बैल या चार महिन्यांकरिता काबाडाकरिता घेऊन त्या बदल्यात पैसे, धान्य वा पावळी देण्याचा सौदा करण्याची येथे शतकीय परंपरा दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे या दोन भागातील कुटुंबियांमध्ये स्नेहाचे वातावरण तयार होते.डी प्लस झोनचा फायदा फक्त उकळलाजून महिन्याच्या प्रारंभी डोंगरपट्टीतील अनेक आदिवासी शेतकरी बैलांच्या शोधात किनारी भागात येतात. येथून बैल घेऊन गेल्यावर त्यांच्याकडून पेरणी व लावणीकरिता चिखलणीची कामे करून घेतली जातात. या ठिकाणी पाठविले जाणारे बैल उखळणीच्या कामाकरिता अप्रशिक्षित असल्याने तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा बैल येताना धण्याकरिता पैसे, भात किंवा पावळी घेऊन येत असल्याने त्याचे जंगी स्वागत होते. पाहुणा खूप दिवसांनीं माघारी परतल्याने या शेतकरी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरारलेले असते. तर त्याच्या सान्निध्यात एवढे महिने घालविल्याने त्याला माघारी सोडताना त्या शेतकºयांची मनस्थिती भावूक झालेली असते. यावेळी शेजारचे दोन्ही शेतकºयांची समजूत घालतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार