शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:37 IST

किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे.

- अनिरुध्द पाटीलबोर्डी - किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे हा बैलांचा सौदा करण्याची पद्धती शेतीला पूरक असून दोन्ही शेतकरी कुटुंबाकरिता फायदेशीर ठरत आहे. यंदा एका बैलाचा मोबदला दोन हजार रु पये आहेत.तालुक्यात खरीप हंगामातील भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून तालुक्यातील शेतीचे समुद्रकिनाºयालगत आणि डोंगरीपट्यातील अशी ढोबळमानाने दोन प्रकारची वर्गवारी करण्यात येते. किनाºयालगतची जमीन सपाट असल्याने चिखलणीसाठी पूर्वी बैलांचा तर हल्ली पॉवर टीलरचा वापर केला जातो तर डोंगराळ भागात खडकाळ आणि उतरणीची जमीन असल्याने येथे यांत्रिक शेतीला मर्यादा असून आजही बैलांच्या माध्यमातून शेती होते.दरम्यान पावसाळ्यात किनारी भागात पेरणी आणि लावणी वगळता बैलांचा वापर होत नाही. शिवाय शेत व पाणथळ जमिनीमुळे जनावरांकरिता गुरचरणाकरिता मर्यादा येतात. त्यांच्या संगोपनाकरिता मनुष्यबळ, वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. त्यामुळे शेतीला आवश्यक जनावरांच्या व्यतिरिक्त अन्य जनावरांचे संगोपन करणे हा शेतकºयांपुढे प्रश्न असतो. उलटपक्षी डोंगरी भागात खाद्याची मुबलकता अधिक असून त्यांना बैलांची आवश्यकता असते. त्यामुळे किनारपट्टीतील शेतकºयांचे बैल या चार महिन्यांकरिता काबाडाकरिता घेऊन त्या बदल्यात पैसे, धान्य वा पावळी देण्याचा सौदा करण्याची येथे शतकीय परंपरा दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे या दोन भागातील कुटुंबियांमध्ये स्नेहाचे वातावरण तयार होते.डी प्लस झोनचा फायदा फक्त उकळलाजून महिन्याच्या प्रारंभी डोंगरपट्टीतील अनेक आदिवासी शेतकरी बैलांच्या शोधात किनारी भागात येतात. येथून बैल घेऊन गेल्यावर त्यांच्याकडून पेरणी व लावणीकरिता चिखलणीची कामे करून घेतली जातात. या ठिकाणी पाठविले जाणारे बैल उखळणीच्या कामाकरिता अप्रशिक्षित असल्याने तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा बैल येताना धण्याकरिता पैसे, भात किंवा पावळी घेऊन येत असल्याने त्याचे जंगी स्वागत होते. पाहुणा खूप दिवसांनीं माघारी परतल्याने या शेतकरी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरारलेले असते. तर त्याच्या सान्निध्यात एवढे महिने घालविल्याने त्याला माघारी सोडताना त्या शेतकºयांची मनस्थिती भावूक झालेली असते. यावेळी शेजारचे दोन्ही शेतकºयांची समजूत घालतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार