शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:37 IST

किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे.

- अनिरुध्द पाटीलबोर्डी - किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे हा बैलांचा सौदा करण्याची पद्धती शेतीला पूरक असून दोन्ही शेतकरी कुटुंबाकरिता फायदेशीर ठरत आहे. यंदा एका बैलाचा मोबदला दोन हजार रु पये आहेत.तालुक्यात खरीप हंगामातील भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून तालुक्यातील शेतीचे समुद्रकिनाºयालगत आणि डोंगरीपट्यातील अशी ढोबळमानाने दोन प्रकारची वर्गवारी करण्यात येते. किनाºयालगतची जमीन सपाट असल्याने चिखलणीसाठी पूर्वी बैलांचा तर हल्ली पॉवर टीलरचा वापर केला जातो तर डोंगराळ भागात खडकाळ आणि उतरणीची जमीन असल्याने येथे यांत्रिक शेतीला मर्यादा असून आजही बैलांच्या माध्यमातून शेती होते.दरम्यान पावसाळ्यात किनारी भागात पेरणी आणि लावणी वगळता बैलांचा वापर होत नाही. शिवाय शेत व पाणथळ जमिनीमुळे जनावरांकरिता गुरचरणाकरिता मर्यादा येतात. त्यांच्या संगोपनाकरिता मनुष्यबळ, वेळ आणि पैसा खर्ची घालावा लागतो. त्यामुळे शेतीला आवश्यक जनावरांच्या व्यतिरिक्त अन्य जनावरांचे संगोपन करणे हा शेतकºयांपुढे प्रश्न असतो. उलटपक्षी डोंगरी भागात खाद्याची मुबलकता अधिक असून त्यांना बैलांची आवश्यकता असते. त्यामुळे किनारपट्टीतील शेतकºयांचे बैल या चार महिन्यांकरिता काबाडाकरिता घेऊन त्या बदल्यात पैसे, धान्य वा पावळी देण्याचा सौदा करण्याची येथे शतकीय परंपरा दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे या दोन भागातील कुटुंबियांमध्ये स्नेहाचे वातावरण तयार होते.डी प्लस झोनचा फायदा फक्त उकळलाजून महिन्याच्या प्रारंभी डोंगरपट्टीतील अनेक आदिवासी शेतकरी बैलांच्या शोधात किनारी भागात येतात. येथून बैल घेऊन गेल्यावर त्यांच्याकडून पेरणी व लावणीकरिता चिखलणीची कामे करून घेतली जातात. या ठिकाणी पाठविले जाणारे बैल उखळणीच्या कामाकरिता अप्रशिक्षित असल्याने तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा बैल येताना धण्याकरिता पैसे, भात किंवा पावळी घेऊन येत असल्याने त्याचे जंगी स्वागत होते. पाहुणा खूप दिवसांनीं माघारी परतल्याने या शेतकरी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरारलेले असते. तर त्याच्या सान्निध्यात एवढे महिने घालविल्याने त्याला माघारी सोडताना त्या शेतकºयांची मनस्थिती भावूक झालेली असते. यावेळी शेजारचे दोन्ही शेतकºयांची समजूत घालतात. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार