शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

श्रवणचा मृतदेह १३ दिवस पडूनच, निष्कळजीपणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:46 IST

बालसुधारगृहात असलेल्या श्रवणकुमार दिलीप राय (१५) या बालकामगाराच्या मृत्यूला तेरा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. श्रवणकुमारच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त करून मृत्यूचे नेमके कारण दिले जात नाही

शशी करपे वसई : बालसुधारगृहात असलेल्या श्रवणकुमार दिलीप राय (१५) या बालकामगाराच्या मृत्यूला तेरा दिवस उलटल्यानंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. श्रवणकुमारच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त करून मृत्यूचे नेमके कारण दिले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर बालकामगाराच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी मुंबई हायकोर्टात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली जाणार असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.१ जून २०१६ रोजी वालीव चिंचोटी येथील धातूच्या बांगड्यांवर नक्षीकाम करणाºया कारखान्यात बचपन बचाव आंदोलन आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने कारवाई करून १६ बालकामगारांची सुटका केली होती. त्यांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. यातील श्रवणकुमारचा १६ आॅगस्ट २०१७ रोजी संशयास्पद मृत्यू झाला आहे.बालकामगारांची मुक्तता करण्यात आल्यानतर वालीव पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना कोणताही आजार अथवा बाधा नव्हती. त्यानंतर त्यांना उल्हासनगर येथील चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करण्यात आले होते. कमिटीने मुलांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली होती. याप्रकरणात पोलिसांनी रोहित चौधरी, पंकज चौधरी, पवन चौधरी, विक्रम चौधरी या मालकांविरोधात गु्न्हा दाखल केला होता.श्रवण हा पवन चौधरी यांच्याकडे कामाला होता. त्याची बालसुधारगृहातून मुक्तता करून पालकाच्या ताब्यात देण्यासाठी चौधरी तीन महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यांनी श्रवणच्या सुटकेसाठी तीस हजार रुपयांचे पोस्टल सेव्हिंग सर्टिफि केटही तयार केले होते. त्यानंतरही श्रवणचा ताबा मिळत नव्हता असा चौधरी यांचा दावा आहे. १२ आॅगस्टला पोटात दुखत असल्याने त्याला इंदिरा गांधी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सुधारगृहात आणले होते. रात्री त्याची प्रकृती जास्तच खालावल्याने त्याला प्रथम ठाणे सिव्हील हॉस्पीटल आणि नंतर मुंबईतील केईएममध्ये नेण्यात आले होते. यावेळी श्रवणच्या पालकांना बोलावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे श्रवणच्या रक्तासाठी दहा हजार रुपये आणि सोनोग्राफीसाठी एक हजार रुपये पवन चौधरी यांच्याकडून घेण्यात आले होते. मात्र, १६ आॅगस्टला उपचार सुरु असतानाच श्रवणचा मृत्यू झाला. बाल सुधारगृहाच्या निष्काळजीपणामुळे श्रवणचा बळी गेला आहे. त्याच्या पालकांनी तेरा दिवस उलटले तरी श्रवणचा मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. बाल सुधारगृह आणि चाईल्ड वेल्फेअर याप्रकरणी दोषी असून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी श्रवणचे वडिल दिलीप राय यांनी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस