शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क, अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; आधुनिक प्रशासनगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 2:45 AM

वसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपेवसई : सुप्रसिद्ध वसई किल्ल््यात सुरु असलेले अवैध प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारण्यासोबतच ठराविक वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव येत्या काही महिन्यांतच संमत होणार आहे.पोर्तुगिजांची हुकुमत उलथवून मराठ्यांनी वसई किल्ला काबिज केला होता. राज्यातील प्रमुख किल्ल्यांमध्ये वसई किल्ल्याचा पाचवा क्रमांक लागतो. १०९ एकरात पसरलेल्या किल्ल्याचे पावित्र्य सध्या सुरू असलेल्या अवैध प्रकारांनी राखले जात नाही तसेच व्यावसायिक फोटोग्राफीसाठी किल्ल्याचा वापर केला जात आहे, अशी तक्रार दुर्गप्रेमींनी केली होती. तिची दखल घेऊन पुरातत्व विभागाने किल्ल्यात निर्बंंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. वसई किल्ल्यात प्रवेश शुल्क आकारणे आणि सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच प्रवेश देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याला लवकरच मंजूरी मिळेल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिक्षक बिपीनचंद्र नेगी यांनी दिली.प्राचीन वास्तू या विविध संस्कृतींचा वारसा असते. मानवजातीने बनवलेली ही कला आहे. धर्मजातीपलिकडचा हा ठेवा आहे. त्यांचे संरक्षण करणे सामाजिक कार्य आहे. पण, पर्यटक या वास्तूंचे सौदर्य नष्ट करण्याचे काम करतात. त्यामुळे संस्कृती, इतिहासाचे साक्षीदार असलेल्या वास्तूंचे जतन, संरक्षण करण्याचे आव्हान पुरातत्व खात्यापुढे असते, असे त्यांनी यावेळी लोकमतशी बोलताना सांगितले.वसई किल्ल्यात होत असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी खात्याने कडक धोरण स्वीकारले आहे. प्रवेश शुल्कासोबतच व्यावसायिक फोटोग्राफीलाही शुल्क आकारण्यात येणार आहे. किल्ल्यात अत्याधुनिक पद्धतीचे प्रसाधनगृह बांधले जाणार आहे. किल्ल्यात प्रवेशाचे बंधन घातले जाणार आहे. यातून स्थानिक गावकºयांना सूट दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.सध्या किल्ल्यात एका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, फादर फ्रान्सिस कोरीया, आमची वसईचे ऋषिकेश वैद्य, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधिक्षक मनोज द्विवेदी, नगरसेविका विद्या पाटील, अलका गमज्या, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक, संरक्षक सहाय्यक कैलाश शिंदे उपस्थित होते. आठवडाभर चालणाºया कार्यक्रमात हेरीटेज वॉक, स्वच्छता अभियान, रांगोळी प्रदर्शन, निबंध, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.तर किल्ल्यातील गोन्सालो गार्सिया चर्चमध्ये चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. पेशव्यांनी वसई किल्ला काबिज करून भारतातील परकीय सत्ता उलथवून टाकण्याचा इतिहासातील पहिला पराक्रम केला. वसईकरांचा मान उंचावणाºया या घटनेचा साक्षिदार असलेला वसई किल्ल्याची वास्तू अबाधित राहिली पाहिजे. या ऐतिहासिक किल्ल्याचा अभ्यास केला तरच वसईकरांना या वास्तूचे महत्व लक्षात येईल, असे प्रतिपादन प्रथम महापौर राजीव पाटील यांनी यावेळी बोलताना केले.पर्यटकांना ऐतिहासिक माहिती मिळावी यासाठी चिमाजी अप्पा स्मारक सुशोभिकरण, थ्रीडी थिएटर, लाईट अँड साऊंड शो केले पाहिजेत. पुरातत्व विभागाने प्रस्ताव दिल्यास महापालिकेच्या वतीने ही कामे करता येतील, असेही पाटील यांनीसांगितले.>वसई किल्ल्याचे ऐतिहासिक महत्वमराठीचे व्याकरण वसईच्या किल्ल्यात शिकवले गेले. ख्रिस्तपुराणाचा अभ्यास किल्ल्यात केला गेला.वसईचा किल्ला म्हणजे ऐतिहासिक माहितीचा खजिना आहे, असे प्रतिपादन फा. फ्रान्सिस कोरीया यांनी यावेळी केले. ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थीआणि उपस्थितांना देण्यात आली.

टॅग्स :FortगडVasai Virarवसई विरार