शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

ग्रामसभेच्या ठरावाला प्रशासनाची केराची टोपली; वर्ष उलटले तरी दगडखाणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:05 IST

तहसीलदारांकडे तक्रार करूनही कारवाई शून्य

मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात ग्रामपंचायत लालोंढे परिसरात येणाऱ्या गवळीपाडा येथील दगडखाणी बंद करण्याच्या ग्रामसभेच्या ठरावाला वर्ष उलटले. त्यानंतर पुन्हा तहसीलदारांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी कारवाई काहीच केली नाही. त्या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. आता महसूल मंत्र्यांनी तरी दखल घ्यावी, अशी मागणी तक्रारदार ग्रामस्थ करीत आहेत. आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ग्रामपंचायत लालोंढे हद्दीत गवळीपाडा जवळील दगड खाणींमध्ये स्फोट केला जातो. त्यामुळे परिसरामध्ये हादरे बसतात. त्यामुळे घरांना भेगा पडल्या आहेत, तर काही घरांच्या पत्र्यांवर दगड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच बोरवेलचे पाणी गायब झाले आहे. तेथील ग्रामस्थांना त्रास होत असल्याने १३/४/२०१८ रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत लालोंढे यांनी ग्रामसभेचा ठराव विविध कार्यालयांत देऊन दगड खाणी बंद करण्यासाठी सांगितले. त्याला एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्यापही कारवाई झालेली नाही.

या प्रकरणी पुन्हा तक्र ार केली, तरी सुद्धा काहीच फरक पडलेला नाही. पालघर तहसीलदार शिंदे व जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यांनी ग्रामसभेच्या ठरावाला व ग्रामस्थांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. अधिक माहितीसाठी तेथील तलाठी एस. चुरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्याच्याकडे रॉयल्टी आहे. तो रीतसर दगड खाण चालवितो. मी घराला तडा गेलेले पत्रे फुटले याचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात पाठवला आहे. त्यांना काय कारवाई करायची ते करतील, असे उत्तर त्यांनी दिले.

तहसीलदार सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना लालोंढे गवळी पाडा कुठे आहे हे माहीत नाही. उत्तर देताना त्यांना काही कळेना. त्यांनी त्यांच्यासोबत त्याच सजेतील तलाठी एस. चुरी यांच्याकडे फोन दिला आणि म्हणाले, त्यांच्याशीच बोला. चुरी म्हणाले, साहेबांनी आदेश दिले तर आज बंद करू. पंचनामे करून ते दिलेले आहेत.

महसूल मंत्र्यांकडे दाद

सध्या नागझरी परिसरात शेकडो दगडखाणी सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून स्फोट केला जातो. त्याचा परिणाम भविष्यात परिसरात होण्याची भीती व्यक्त केली जात आहें महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धोकादायक दगड खाणी बंद कराव्यात, अशी मागणी चंद्रकांत गवळी व अन्य ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस