शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

ग्रामसभेच्या ठरावाला प्रशासनाची केराची टोपली; वर्ष उलटले तरी दगडखाणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:05 IST

तहसीलदारांकडे तक्रार करूनही कारवाई शून्य

मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात ग्रामपंचायत लालोंढे परिसरात येणाऱ्या गवळीपाडा येथील दगडखाणी बंद करण्याच्या ग्रामसभेच्या ठरावाला वर्ष उलटले. त्यानंतर पुन्हा तहसीलदारांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी कारवाई काहीच केली नाही. त्या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. आता महसूल मंत्र्यांनी तरी दखल घ्यावी, अशी मागणी तक्रारदार ग्रामस्थ करीत आहेत. आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ग्रामपंचायत लालोंढे हद्दीत गवळीपाडा जवळील दगड खाणींमध्ये स्फोट केला जातो. त्यामुळे परिसरामध्ये हादरे बसतात. त्यामुळे घरांना भेगा पडल्या आहेत, तर काही घरांच्या पत्र्यांवर दगड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच बोरवेलचे पाणी गायब झाले आहे. तेथील ग्रामस्थांना त्रास होत असल्याने १३/४/२०१८ रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत लालोंढे यांनी ग्रामसभेचा ठराव विविध कार्यालयांत देऊन दगड खाणी बंद करण्यासाठी सांगितले. त्याला एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्यापही कारवाई झालेली नाही.

या प्रकरणी पुन्हा तक्र ार केली, तरी सुद्धा काहीच फरक पडलेला नाही. पालघर तहसीलदार शिंदे व जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यांनी ग्रामसभेच्या ठरावाला व ग्रामस्थांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. अधिक माहितीसाठी तेथील तलाठी एस. चुरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्याच्याकडे रॉयल्टी आहे. तो रीतसर दगड खाण चालवितो. मी घराला तडा गेलेले पत्रे फुटले याचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात पाठवला आहे. त्यांना काय कारवाई करायची ते करतील, असे उत्तर त्यांनी दिले.

तहसीलदार सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना लालोंढे गवळी पाडा कुठे आहे हे माहीत नाही. उत्तर देताना त्यांना काही कळेना. त्यांनी त्यांच्यासोबत त्याच सजेतील तलाठी एस. चुरी यांच्याकडे फोन दिला आणि म्हणाले, त्यांच्याशीच बोला. चुरी म्हणाले, साहेबांनी आदेश दिले तर आज बंद करू. पंचनामे करून ते दिलेले आहेत.

महसूल मंत्र्यांकडे दाद

सध्या नागझरी परिसरात शेकडो दगडखाणी सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून स्फोट केला जातो. त्याचा परिणाम भविष्यात परिसरात होण्याची भीती व्यक्त केली जात आहें महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धोकादायक दगड खाणी बंद कराव्यात, अशी मागणी चंद्रकांत गवळी व अन्य ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस