शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

डहाणूत पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा; स्मशानभूमीत पोहोचायलाही रस्ता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 10:13 IST

गेल्या आठवड्यात तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा येथे नाल्यावर पूल किंवा रस्ता नसल्याने नागरिकांना चक्क अंत्ययात्रेदरम्यान मृतदेह पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली.

हितेन नाईक

पालघर : जिल्हा निर्मितीला दहा वर्षे उलटली तरी अद्याप रस्ते, वीज, पाणी या गरजेच्या सुविधांपासून पालघरवासीय वंचित आहेत, याचा प्रत्यय विविध घटनांतून येत असतो. अनेक गावपाड्यात जायला रस्ते नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात तर येथील नागरिकांचा संपर्क तुटतो, तर कधी जीव धोक्यात घालून या पाण्यातून त्यांना प्रवास करावा लागतो. गेल्या आठवड्यात तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा येथे नाल्यावर पूल किंवा रस्ता नसल्याने नागरिकांना चक्क अंत्ययात्रेदरम्यान मृतदेह पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली.

  पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून, एकूण ९०४ गावांत अनेक ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव आहे. अजूनही केळवे पाली पाडा येथील स्मशानभूमीत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागते, तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा या ठिकाणीही शनिवारी नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह कमरेभर पाण्यातून न्यावा लागला होता. 

निधी मिळूनही सुविधांपासून वंचित?

डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायतीमध्ये आठवडाभरापूर्वी विजय वझे यांच्या आईचा मृत्यू झाल्यावर स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठा पाऊस आल्याने मृतदेह प्लास्टिकने झाकण्याची वेळ नातेवाइकांवर आली होती. केंद्र आणि राज्य शासन पेसाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी देत असताना जिल्ह्यातील गावपाडे आणि तेथील आदिवासी समाज अजूनही सोयी-सुविधांपासून वंचित का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

केळवे पालीपाडा येथील आदिवासी बांधवांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कमरेइतक्या पाण्यातून जाण्याची वेळ येत असेल तर याच्याइतके दुर्दैव ते काय? या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.

- ॲड. प्रथमेश प्रभोतेंडोलकर, पालघर