शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

समुद्रात ५०० नौका अडकल्या, एक लाख मच्छीमारांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 12:05 IST

ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोचला आहे.

पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यासह तुफानी लाटा उसळू लागल्याने जिल्ह्यातील 500 ते 600 मच्छिमार नौका आणि त्या मधील सुमारे 1 लाख मच्छीमारांचा जीव धोक्यात सापडला आहे. तुफानी लाटांचा मारा सहन करीत काही नौका किनाऱ्यावर हळू हळू येत असून शासनाने त्याच्या बचावासाठी यंत्रणा पाठविणे गरजेचे बनले आहे. या दरम्यान सकाळ पासून किनारपट्टीवर घोगावणाऱ्या वादळी वाऱ्याने मच्छीमारांच्या प्रत्येक घरातील धाकधूक  मात्र आता वाढू लागली आहे.

ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोहोचला आहे.परंपरागत मच्छीमारांची 15 मे ते 15 ऑगस्ट या  मासेमारी बंदीच्या कालावधीचे आदेश काढण्याची अनेक वर्षांच्या मागणीकडे केंद्र व राज्य शासन दुर्लक्ष करीत आल्याने समुद्रात नाईलाजाने मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांचा जीव धोक्यात सापडला आहे.  या धोकादायक अवस्थेत समुद्रात मासेमारी करायला भाग पडणाऱ्या शासन व त्याच्या यंत्रणे विरोधात मच्छीमारांमध्ये सध्या प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे, दांडी, नवापूर, डहाणू, वसई, अर्नाळा, नायगाव तर ठाणे जिल्ह्यातील उत्तन आदी भागातील सुमारे 600 नौका समुद्रात गेल्या असून मुसळधार पाऊस आणि महाकाय लाटा उसळत असल्याने आम्ही किनारी परत आल्याचे हरेश मेहेर या मच्छिमाराने 'लोकमत'ला सांगितले. 6 ऑगस्टपर्यंत गोवा, मुंबई ते गुजरातपर्यंतच्या भागात समुद्रात वादळी वातावरण राहणार असल्याने मच्छीमारांची कुटुंबीय चिंताग्रस्त झाली आहेत. कारण, मुंबई-गुजरात दरम्यानच्या 40 ते 55 नॉटिकल समुद्री क्षेत्रात सध्या या सर्व नौका मासेमारी साठी उभ्या असल्याने पावसाचा जोर वाढत असून वाऱ्याचा वेग वाढल्याने नौका मधील सुमारे 1 लाख मच्छिमार व खलाशी कामगारांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

आणखी बातम्या...

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प!    

मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली    

जोरदार पावसाने डोंबिवली शहराला झोडपले, चाकरमान्यांचे नियोजन कोलमडले    

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा    

टॅग्स :palgharपालघरMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट