शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पनवेलमधील नशा मुक्ती केंद्रातून ५०-६० जणांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 06:24 IST

मारहाणीची भीती : सांगुर्ली येथील हार्मोनी केंद्रातील प्रकार

मयूर तांबडे

पनवेल : सांगुर्ली येथील हार्मोनी फाउंडेशन, अल्कोलिक अ‍ॅण्ड ड्रग्ज रिअ‍ॅबिलेटेशन केंद्रचालकाविरोधात शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्यांना होणारी मारहाण व उपासमारीच्या भीतीमुळे केंद्रातून ५० ते ६० जणांनी पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवार, १ एप्रिल व बुधवार, ३ एप्रिलदरम्यान केंद्रातून ५० ते ६० जणांनी पलायन केल्याचे उघड झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे असलेले हार्मोनी सेंटर काही महिन्यांपूर्वी सांगुर्ली येथे भाड्याच्या जागेमध्ये हलविण्यात आले आहे. येथे जवळपास १८३ जणांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. २३ मार्च रोजी येथे उपचारासाठी आलेल्या प्रशांत मधुकर पवार याचा मृत्यू झाला होता. या वेळी डॉक्टरांनी त्याच्या छातीच्या बरगडीला दुखापती झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनुसार केंद्रचालकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.दरम्यान, केंद्रात सोमवारी व बुधवारी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ५० ते ६० जणांनी पलायन केले. यातील काही जण आपापल्या घरी गेले असून काहींचा पत्ता लागत नसल्याचे समोर आले.नशा मुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग गाठला व ट्रकला हात दाखवून ते पळस्पे फाटा (जेएनपीटी मार्ग) येथे उतरले. त्यानंतर काहींनी आपल्या घराची वाट धरली. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी होत असलेले हाल, मारहाण, अस्वच्छता, खायला न देणे याबाबत कुटुंबाला सांगितले.

या प्रकरणी प्रतिनिधी हार्मोनी नशा मुक्ती केंद्रात गेले असता, आपल्या नातेवाइकाला घेण्यासाठी आलेल्या कुटुंबाने येथील वागणुकीबद्दल माहिती दिली. तसेच एका महिलेने, तिच्या पतीने बुधवारी मारहाण व त्रासाला वैतागून पलायन केले असून याबाबत जाब विचारण्यासाठी त्यांचे कुटुंब केंद्रात आले होते. त्यांचे पती सतीश बामुगडे हे ७ महिन्यांपासून येथे उपचार घेत असून त्यांना महिन्याला १० हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. मात्र, त्या बदल्यात कोणत्याच सुविधा मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जेवणाचे हाल व मारहाण केली जात असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. तर मिलिंद सुतार यांनीही याच त्रासाला वैतागून लोखंडी ग्रील तोडून पलायन केले. १० ते १५ जण मिळून उपचारासाठी आणलेल्यांना १ नंबरच्या खोलीत नेऊन जबर मारहाण करत असल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे. येथे औषधे, गोळ्या, कपडेदेखील कधी देत नाहीत. तसेच घरच्यांनादेखील भेटू दिले जात नाही. तर येथे आलेले काही जण आपल्या घरी जात नसत. ते तेथेच राहून इतरांना मार्गदर्शन करायचे. तर या ठिकाणी ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याचे अजित चव्हाण यांनी सांगितले.संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी पत्रव्यवहारहार्मोनी नशा मुक्ती केंद्रात उपचारासाठी दाखल झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी धर्मादाय आयुक्त अलिबाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.नोंद ग्रामपंचायतीत करणे गरजेचेहार्मोनी नशा मुक्ती केंद्राने हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. येथे मृत पावलेल्या नागरिकांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करणे गरजेचे आहे. मात्र त्यांनी नोंद केलेली नाही.नेहमी व्हायची मारहाणकाही दिवसांपूर्वी केंद्रातून एक कैची हरविल्याने आम्हाला शिक्षा म्हणून गरम पाण्यात मसाला, मीठ टाकून सोयाबीन खायला द्यायचे. केंद्रात १५ ते २० जण येऊन नेहमी मारहाण करायचे. जेवणात सोडा टाकलेला भात, कच्ची चपाती असल्याने साहजिकच येथील रु ग्ण जेवण सोडून द्यायचे.- अजित चव्हाण, उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रु ग्ण

टॅग्स :panvelपनवेलliquor banदारूबंदी