शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

मच्छी मार्केटला ३२ लाख, वसईतील हजारो मच्छिमार महिलांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 3:09 AM

वसई : अर्नाळा समुद्रकिनारी मच्छिमारांसाठी राखीव असलेल्या जागेत सुकी मासळी बाजारासाठी शेड बांधण्यात येणार आहे.

शशी करपे वसई : अर्नाळा समुद्रकिनारी मच्छिमारांसाठी राखीव असलेल्या जागेत सुकी मासळी बाजारासाठी शेड बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी मासळी विक्रेत्या महिलांसाठी विविध सोयी केल्या जाणार आहेत. या मार्केट शेडसाठी जिल्हा नियोजन समितीने ३२ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीला मंजूरी दिली असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.अर्नाळा हे वसई तालुक्यातील मुख्य बंदर आहे. येथील सुके बोंबील आणि जवळा प्रसिद्ध आहे. या मासळीचा व्यवसाय प्रामुख्याने अर्नाळ््यात होत असून शेकडो मच्छीमार महिला सुकी मासळी विक्रीचा व्यवसाय करीत असतात तरीही अर्नाळा गावात सुकी मासळीसाठी मार्केट नव्हते. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून आगाशी गावात दर सोमवारी आठवडेबाजार भरत असतो. त्यात अर्नाळ््यातीलच सुकी मासळी सर्वात अधिक विकली जाते. या बाजारात येणाºया महिलांसाठी कुठल्याही सोयी सुविधा नाहीत. महिला ऊन-पावसात उघड्यावरच मासे विकायला बसतात. त्यांची ही परवड लक्षात घेऊन अर्नाळा गावातच सुक्या मासळीचा बाजार सुरु व्हावा यासाठी अर्नाळ््यात मार्केट बांधण्यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत सवरा यांनी जिल्हा नियोजन समितीतून मार्केट शेड बांधण्यासाठी ३२ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे.अर्नाळा एसटी डेपोसमोर ३५ एकर जागा मासळी सुकवणे, जाळी विणणे, बोटी शाकारणे यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्याठिकाणी आता मार्केट शेड बांधण्यात येणार आहे. तसेच महिला विक्रेत्यांसाठी प्राथमिक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा फायदा वसई तालुक्यातील हजारो मच्छीविक्रेत्या महिलांना होणार असून त्यांच्या अडचणीही दूर होणार आहेत.> राखीव भूखंडावरील अतिक्रमणे हटविणारमच्छिमारांसाठी राखीव असलेल्या भूखंडांवर अ़नेक रिसॉर्ट चालकांनी अतिक्रमण केले आहे. त्याठिकाणी बागा बनवून त्या पार्टीसाठी भाड्याने दिल्या जात आहेत. तर काहींनी पार्किंगची सुविधा केली आहे. काहींनी सरकारकडून झाडे लावण्यासाठी जागा स्वत:च्या नावावर करून घेतली आहे. प्रत्यक्षात अटी आणि शर्तींचा भंग करून त्यांनी त्याचा व्यावसायिक वापर सुरु केला आहे. तर राखीव भूखंडावरही अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहेत. मच्छिमारांसाठी राखीव असलेल्या भूखंडावरील ही अतिक्रमणे दूर करून तो मच्छिमारांच्या वापरासाठी मोकळा करण्यात यावा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.