शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वसईतील 29 गावांची वाटचाल महानगरपालिका-मुक्तीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 01:04 IST

सूचना-हरकतींचा पुन्हा घाट कुणासाठी? : वसईत संतप्त प्रतिक्रिया

वसई : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय यापूर्वीच सन २०११ मध्ये होऊन राज्य शासनाने ऑक्टोबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असताना २९ गावांत ग्रामपंचायतींची पुनर्स्थापना की नगर परिषद स्थापन करावी? याबाबत विचारविनिमय करून तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असताना पुन्हा सूचना व हरकती कशासाठी, असा संतप्त सवाल शिवसेना नेते विजयशेठ पाटील व काँग्रेसचे ॲड. जिमी घोन्सालवीस यांनी विचारला आहे.

याचिकाकर्ते ॲड. जिमी घोन्सालवीस यांनी गावे वगळण्याच्या आजपर्यंतच्या शासन प्रवासाचे मुद्देसूद वर्णन करणारे एक १४ पानांचे निवेदनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. दरम्यान, २९ गावे वगळून १० वर्षे लोटली तरी आता महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा ही गावे वगळण्याबाबत नव्याने कोकण विभागीय आयुक्तांनी सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यास पश्चिम व पूर्व भागांतील विविध संघ व ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला आहे.वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याच्या निर्णयासाठी राज्य शासनाने दुसऱ्यांदा कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून त्यासाठी दि. १७ नोव्हेंबरपासून हरकती आणि सूचना मागवण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी वसई-विरार महापालिका उपायुक्त, वसई तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था केली आहे. मात्र, या जनसुनावणीला वसईच्या ग्रामस्थांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे.

तत्कालीन कोकण विभागीय आयुक्तांच्या समितीने ग्रामस्थांच्या हरकती आणि सूचना मागवून गावे वगळण्याचा अहवाल शासनाला पूर्वीच सादर केला होता. त्यानुसार ३१ मे २०११ रोजी शासनाने अधिसूचना काढून वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळली होती. गावे वगळण्याचा निर्णय झालेला असताना आता नव्याने गावे वगळण्याच्या प्रक्रिया पुन्हा का, असा सवालदेखील येथील ग्रामस्थांनी केला आहे. महापालिकेने याचिका दाखल करून पूर्वी चुकीच्या पद्धतीने स्थगिती मिळवली. त्यांना जनसुनावणीत अधिकार देणे योग्य नाही. गावे वगळली गेल्याचा शासन निर्णय झाला असताना नव्याने सुनावणी घेणे हे बेकायदेशीर असून या जनसुनावणीला आम्ही स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही ॲड. जिमी घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सत्ताधारी महाविकास आघाडीला घरचा आहेर 

दि. ८ ऑक्टोबर रोजी शासनाच्या वतीने नगरविकास विभागाचे उपसचिव यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात गावे वगळण्याचा शासन निर्णय झाला असल्याचे नमूद आहे. या २९ गावांमध्ये पुन्हा ग्रामपंचायत स्थापन करावी अथवा या गावांची नगर परिषद बनवावी, याचा निर्णय व्हायचा आहे. 

स्थानिक पातळीवर सल्लामसलत करून याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यातनमूद करण्यात आले आहे. मग नव्याने हरकती-सूचना यांचा घाट कुणासाठी घालण्यात येत आहे, असा सवाल शिवसेना नेते विजय पाटील यांनी केला असून या जनसुनावणीला विरोध करून सत्ताधारी पक्षाला घरचा आहेरच दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका