शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

वसईतील 29 गावांची वाटचाल महानगरपालिका-मुक्तीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 01:04 IST

सूचना-हरकतींचा पुन्हा घाट कुणासाठी? : वसईत संतप्त प्रतिक्रिया

वसई : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय यापूर्वीच सन २०११ मध्ये होऊन राज्य शासनाने ऑक्टोबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असताना २९ गावांत ग्रामपंचायतींची पुनर्स्थापना की नगर परिषद स्थापन करावी? याबाबत विचारविनिमय करून तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असताना पुन्हा सूचना व हरकती कशासाठी, असा संतप्त सवाल शिवसेना नेते विजयशेठ पाटील व काँग्रेसचे ॲड. जिमी घोन्सालवीस यांनी विचारला आहे.

याचिकाकर्ते ॲड. जिमी घोन्सालवीस यांनी गावे वगळण्याच्या आजपर्यंतच्या शासन प्रवासाचे मुद्देसूद वर्णन करणारे एक १४ पानांचे निवेदनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. दरम्यान, २९ गावे वगळून १० वर्षे लोटली तरी आता महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा ही गावे वगळण्याबाबत नव्याने कोकण विभागीय आयुक्तांनी सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यास पश्चिम व पूर्व भागांतील विविध संघ व ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला आहे.वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याच्या निर्णयासाठी राज्य शासनाने दुसऱ्यांदा कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून त्यासाठी दि. १७ नोव्हेंबरपासून हरकती आणि सूचना मागवण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी वसई-विरार महापालिका उपायुक्त, वसई तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था केली आहे. मात्र, या जनसुनावणीला वसईच्या ग्रामस्थांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे.

तत्कालीन कोकण विभागीय आयुक्तांच्या समितीने ग्रामस्थांच्या हरकती आणि सूचना मागवून गावे वगळण्याचा अहवाल शासनाला पूर्वीच सादर केला होता. त्यानुसार ३१ मे २०११ रोजी शासनाने अधिसूचना काढून वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळली होती. गावे वगळण्याचा निर्णय झालेला असताना आता नव्याने गावे वगळण्याच्या प्रक्रिया पुन्हा का, असा सवालदेखील येथील ग्रामस्थांनी केला आहे. महापालिकेने याचिका दाखल करून पूर्वी चुकीच्या पद्धतीने स्थगिती मिळवली. त्यांना जनसुनावणीत अधिकार देणे योग्य नाही. गावे वगळली गेल्याचा शासन निर्णय झाला असताना नव्याने सुनावणी घेणे हे बेकायदेशीर असून या जनसुनावणीला आम्ही स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही ॲड. जिमी घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सत्ताधारी महाविकास आघाडीला घरचा आहेर 

दि. ८ ऑक्टोबर रोजी शासनाच्या वतीने नगरविकास विभागाचे उपसचिव यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात गावे वगळण्याचा शासन निर्णय झाला असल्याचे नमूद आहे. या २९ गावांमध्ये पुन्हा ग्रामपंचायत स्थापन करावी अथवा या गावांची नगर परिषद बनवावी, याचा निर्णय व्हायचा आहे. 

स्थानिक पातळीवर सल्लामसलत करून याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यातनमूद करण्यात आले आहे. मग नव्याने हरकती-सूचना यांचा घाट कुणासाठी घालण्यात येत आहे, असा सवाल शिवसेना नेते विजय पाटील यांनी केला असून या जनसुनावणीला विरोध करून सत्ताधारी पक्षाला घरचा आहेरच दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका