शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

त्या २७ गावांना मिळणार मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:36 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे.२७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर केला होता. राज्य सरकारमार्फत महापालिकेचा सविस्तर कृती आराखडा केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. अमृत अभियानांतर्गत मंजुरी देण्याकरिता राज्यस्तरीय तांत्रिक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी महापालिकेतील २७ गावांच्या १८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे. या बैठकीस महापालिका आयुक्त पी. वेलारासू, जलअभियंता चंद्रकांत कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.२७ गावांचा परिसर ४० चौरस किलोमीटर इतका आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी २८ जलकुंभ, १२ पंप, दोन संप गृहे आणि २२३ किलोमीटर इतकी लांब जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. १८० कोटी रुपये या योजनेचा खर्च असला, तरी ५० टक्के केंद्र सरकार व ५० टक्के राज्य सरकार खर्च करणार आहे. केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पासाठी १५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महापालिकेच्या १२ सेक्टरमध्ये ही कामे केली जाणार आहेत. त्यांची निविदा काढली आहे. कंत्राटदाराला कार्यादेश लवकर दिला जाणार आहे. याशिवाय, रस्तेवाहतूक व जलवाहतुकीचा सविस्तर कृतीआराखडा लवकर सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती अमृत योजनेचे नोडल अधिकारी व अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिली आहे.महापालिकेने २००९ मध्ये यूपीए सरकारच्या काळात नेतिवली येथे १५० कोटींची पाणीपुरवठा योजना हाती घेतली होती. त्यातून २०१३ अखेर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. बारावे, नेतिवली, मोहिली येथे महापालिकेची जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यामुळे पाण्यासाठीचे एमआयडीसीवरील परावलंबित्व २०१३ मध्ये संपुष्टात आले.पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. हा मुद्दा स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी उचलून धरला होता. हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य कुणाल पाटील यांनी पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार, असा सवाल केला होता. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत.अवलंबित्व संपणारकेडीएमसीत २७ गावे १ जून २०१५ रोजी समाविष्ट झाली. या गावांना एमआयडीसीकडून दररोज ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी गावांना अपुरे पडत असल्याने त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १८० कोटींची योजना पूर्णत्वास आल्यावर २७ गावांचे एमआयडीसीवरील अवलंबित्व संपुष्टात येणार आहे.