शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

त्या २७ गावांना मिळणार मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 05:36 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे.

 कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे.२७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर केला होता. राज्य सरकारमार्फत महापालिकेचा सविस्तर कृती आराखडा केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. अमृत अभियानांतर्गत मंजुरी देण्याकरिता राज्यस्तरीय तांत्रिक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी महापालिकेतील २७ गावांच्या १८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे. या बैठकीस महापालिका आयुक्त पी. वेलारासू, जलअभियंता चंद्रकांत कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.२७ गावांचा परिसर ४० चौरस किलोमीटर इतका आहे. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी २८ जलकुंभ, १२ पंप, दोन संप गृहे आणि २२३ किलोमीटर इतकी लांब जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. १८० कोटी रुपये या योजनेचा खर्च असला, तरी ५० टक्के केंद्र सरकार व ५० टक्के राज्य सरकार खर्च करणार आहे. केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पासाठी १५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महापालिकेच्या १२ सेक्टरमध्ये ही कामे केली जाणार आहेत. त्यांची निविदा काढली आहे. कंत्राटदाराला कार्यादेश लवकर दिला जाणार आहे. याशिवाय, रस्तेवाहतूक व जलवाहतुकीचा सविस्तर कृतीआराखडा लवकर सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती अमृत योजनेचे नोडल अधिकारी व अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी दिली आहे.महापालिकेने २००९ मध्ये यूपीए सरकारच्या काळात नेतिवली येथे १५० कोटींची पाणीपुरवठा योजना हाती घेतली होती. त्यातून २०१३ अखेर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. बारावे, नेतिवली, मोहिली येथे महापालिकेची जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यामुळे पाण्यासाठीचे एमआयडीसीवरील परावलंबित्व २०१३ मध्ये संपुष्टात आले.पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. हा मुद्दा स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी उचलून धरला होता. हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य कुणाल पाटील यांनी पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार, असा सवाल केला होता. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत.अवलंबित्व संपणारकेडीएमसीत २७ गावे १ जून २०१५ रोजी समाविष्ट झाली. या गावांना एमआयडीसीकडून दररोज ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. हे पाणी गावांना अपुरे पडत असल्याने त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १८० कोटींची योजना पूर्णत्वास आल्यावर २७ गावांचे एमआयडीसीवरील अवलंबित्व संपुष्टात येणार आहे.