शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

ठाणे-पालघर जिल्हयातील २४ हजार संस्था संपर्कात नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 3:37 AM

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.

वसई : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.नोंदणीकृत संस्थांचा कारभार नियमितपणे चालावा, त्यासाठी संस्थांनी नियमितपणे लेखापरिक्षण करावे आणि बदल कळवावेत यासाठी ठाणे जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल सादर न करणाºया संस्थांची नोंदणी रद्द होते. अशा संस्थांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाघोली येथील शनी मंदिरात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे धर्मदाय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त रिना राय, छाया उमरेडकर, निरीक्षक राजेश राठोड, कार्यालय अधिक्षक सायली महाजन उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, फादर अल्मेडा, वसई जनता बँकेचे उपाध्यक्ष संतोष देशमुख, शनी मंदिर ट्र्स्टचे जयवंत नाईक, दत्तात्रेय देशमुख यावेळी हजर होते.पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कार्यालयाला कळवले नाहीत तर त्यांची नोंदणी कायद्यानुसार रद्द होते. पण, चांगले सामाजिक कार्य करणाºया संस्थांना काही कारणास्तव लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कळवता आले नसतील असे गृहीत धरून ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे, असेही महाजन यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी होणाºया संस्थांना मार्गदर्शन केले जाईल तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार नाही, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.यापुढे लेखापरिक्षण अहवाल किंवा संस्थेतील बदल सादर करण्यासाठी ठाण्याला यायची गरज नाही. चॅरिटी डॉट महाराष्ट्र जीओव्ही या वेबसाईटवर जाऊन संस्थांनी आपले अहवाल सादर करावेत. माहिती देताना वर्गणी मागण्यासाठी जीएसटीची आवश्यकता नाही. पाच हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाºया संस्थांना लेखापरिक्षणाची गरज नाही, अशी माहिती राजेश राठोड यांनी यावेळी बोलताना दिली.पालघर जिल्ह्यात किमान पंधरा हजार नोंदणीकृत संस्था आहेत. असे असताना येथील संस्थांच्या पदाधिकाºयांना ठाण्याला जावे लागते.स्वतंत्र्य कार्यालय हवे!- ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजारांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे. मात्र, यातील २४ हजारांहून अधिक संस्था संपर्कात नसून त्यांच्याशी संवाद साधणेही कठीण जात आहे, अशी माहिती सायली महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.जिल्ह्यासाठी स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोंदणीकृत संस्थांना कामासाठी दूरवरच्या ठाण्याला जावे लागते. म्हणूनच स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यात यावे, अशी मागणी या शिबीरात उपस्थित संस्थांच्या पदाधिका-यांनी केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे