शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

ठाणे-पालघर जिल्हयातील २४ हजार संस्था संपर्कात नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:37 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.

वसई : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही.नोंदणीकृत संस्थांचा कारभार नियमितपणे चालावा, त्यासाठी संस्थांनी नियमितपणे लेखापरिक्षण करावे आणि बदल कळवावेत यासाठी ठाणे जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल सादर न करणाºया संस्थांची नोंदणी रद्द होते. अशा संस्थांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी एक विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाघोली येथील शनी मंदिरात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे धर्मदाय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक धर्मदाय आयुक्त रिना राय, छाया उमरेडकर, निरीक्षक राजेश राठोड, कार्यालय अधिक्षक सायली महाजन उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, फादर अल्मेडा, वसई जनता बँकेचे उपाध्यक्ष संतोष देशमुख, शनी मंदिर ट्र्स्टचे जयवंत नाईक, दत्तात्रेय देशमुख यावेळी हजर होते.पाच वर्षांहून अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कार्यालयाला कळवले नाहीत तर त्यांची नोंदणी कायद्यानुसार रद्द होते. पण, चांगले सामाजिक कार्य करणाºया संस्थांना काही कारणास्तव लेखापरिक्षण अहवाल आणि बदल कळवता आले नसतील असे गृहीत धरून ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे, असेही महाजन यांनी सांगितले. या मोहिमेत सहभागी होणाºया संस्थांना मार्गदर्शन केले जाईल तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार नाही, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.यापुढे लेखापरिक्षण अहवाल किंवा संस्थेतील बदल सादर करण्यासाठी ठाण्याला यायची गरज नाही. चॅरिटी डॉट महाराष्ट्र जीओव्ही या वेबसाईटवर जाऊन संस्थांनी आपले अहवाल सादर करावेत. माहिती देताना वर्गणी मागण्यासाठी जीएसटीची आवश्यकता नाही. पाच हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाºया संस्थांना लेखापरिक्षणाची गरज नाही, अशी माहिती राजेश राठोड यांनी यावेळी बोलताना दिली.पालघर जिल्ह्यात किमान पंधरा हजार नोंदणीकृत संस्था आहेत. असे असताना येथील संस्थांच्या पदाधिकाºयांना ठाण्याला जावे लागते.स्वतंत्र्य कार्यालय हवे!- ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजारांहून अधिक संस्थांनी नोंदणी केली आहे. मात्र, यातील २४ हजारांहून अधिक संस्था संपर्कात नसून त्यांच्याशी संवाद साधणेही कठीण जात आहे, अशी माहिती सायली महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.जिल्ह्यासाठी स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोंदणीकृत संस्थांना कामासाठी दूरवरच्या ठाण्याला जावे लागते. म्हणूनच स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यात यावे, अशी मागणी या शिबीरात उपस्थित संस्थांच्या पदाधिका-यांनी केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे