शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

वसईतून १५०० मजूर कोलकाताकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:24 AM

श्रमिक ट्रेनची व्यवस्था । सर्व मजूर पश्चिम बंगाल परिसरातील

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात मागील अडीच महिन्यांपासून अडकून पडलेल्या आणखी १५०० परप्रांतीय मजुरांची शनिवारी त्यांच्या गावाकडे रवानगी करण्यात आली. हे सर्व मजूर आणि त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमधील असून कोलकातामध्ये त्यांना सोडले जाणार आहे.याआधी २६ मे रोजी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सात श्रमिक ट्रेन उत्तर प्रदेश राज्यासाठी रवाना झाल्या होत्या. त्यानंतरचे तीन दिवस ट्रेन उपलब्ध झालेली नव्हती. परंतु शनिवारी दुपारी दोन वाजता पश्चिम बंगालसाठी एक श्रमिक ट्रेन उपलब्ध करून देण्यात आली. मुजरांच्या नोंदणीसह सर्व सोपस्कार पूर्ण होऊन संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वसई रोड स्थानकातून ही ट्रेन कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन पश्चिम बंगालच्या दिशेने रवाना झाली. या ट्रेनमधून १५०० प्रवासी रवाना करण्यात आल्याची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे वसई तालुक्यातील मजुरांंचे लोंढे गावी जाण्यासाठी स्टेशन परिसरात गर्दी करीत आहेत. या मुजरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी प्रशासनाकडून रेल्वे गाड्या तसेच बसेसची व्यवस्था केली जात आहे. गावी जाण्यासाठी तहसीलदारांकडे नोंदणी केलेल्या आणि संबंधित राज्यांकडून एनओसी प्राप्तझाल्यानंतर संबंधित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली जाते.प्रशासनाची डोकेदुखी वाढतीचवसई परिसरात अडकून पडलेले हे सर्व पररप्रांतीय मजूर, कामगार मागील महिन्यापासून हजारोंच्या संख्येने वसईत सनसिटी मैदानात जमून गर्दी करीत आहेत. मात्र ज्याची महसूल विभागाकडे नोंदणी व संदेश येतो, अशांनाच मैदानातून पालिकेच्या बसेसमार्फत नवघर डेपोत आणून तिथे त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यांना मास्क, सॅनिटाईज, जेवण, नाष्टा, सोबत खाण्याचे साहित्य आदी देत ट्रेनमध्ये बसविण्यात येते. हे सर्व नियोजन जिल्हा व वसई महसूल विभाग, पोलीस, महापालिका, आरोग्य पथक तसेच सामाजिक संघटनांद्वारे पार पाडले जात आहे. रीतसर नोंदणी व संदेशप्राप्त मजूरच या गाडीतून प्रवास करू शकतात हे खरे असले तरीही गावी जाणाऱ्यांची गर्दी कमी होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढते आहे.