शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हातात झाडू घेऊन जिप सीईओंनी केली ग्रामस्वच्छता; ग्रामस्थांना पटवून दिले शोषखड्ड्यांचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 12:54 IST

नागाझरी गावातून झाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेचा श्रीगणेशा

वर्धा : महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक गाव असो वा शहर स्वच्छ राहिले पाहिजे. स्वच्छ गाव ही निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक नागरिकाला पटवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी खुद्द हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छता केली.

संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि १९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन अभियान या तीनही अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ कारंजा तालुक्यातील नागाझरी या गावात झाला. याच कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या सीईओ रोहन घुगे यांनी स्वत: हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छता केली. शिवाय शोषखड्ड्यांचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, सामान्य प्रशासन तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, उपअभियंता विलास काळबांडे, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख, सरपंच रमेश लोहकरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

अभियानात ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचाच : घुगे

संबंधित अभियानात ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. स्वच्छतेच्या कामांमध्ये सर्वांनी पुढे येऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राेहन घुगे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी घुगे यांनी शोषखड्ड्यांसाठी खड्डा खोदला शिवाय नागाझरी गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची सद्य:स्थिती, शास्वत स्वच्छतेबाबत स्थिती, पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनची कामे, घरकुल, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड आदींची पाहणी केली.

टॅग्स :Socialसामाजिकgram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषदwardha-acवर्धा