शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबसस्थानक चौकातील घटना : ट्रकचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : भाजी घेण्यास गेलेल्या युवकाला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात युवक गंभीर जखमी झाला. बसस्थानक चौक परिसरात हा अपघात झाला.राहुल चौधरी (२१) रा. मोहगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.राहुल चौधरी हा बसस्थानक चौकात रस्त्याच्या कडेला भरत असलेल्या भाजीबाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेला होता. दरम्यान भरधाव येणाºया एम.एच.३४ बि.जी. २७२४ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. अपघातात राहुलचा उजवा पाय निकामी झाला. धडक दिल्यावर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला.पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.गतिरोधक देण्याची मागणीबसस्थानक चौक परिसरात चौरस्ता असून मोठी बाजारपेठ आहे. बाहेर गावावरून येणाºया नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते. हैद्राबाद मार्गे येणाºया ट्रकला भंडारा मार्गे रायपूरजवळ पडत असल्याने २४ तास अवजड वाहनांचे आवागमण असते. या रस्त्याचे काम होवून तीन महिने उलटले असूनही बसस्थानक चौकात गतिरोधक दिले नसल्याने हा चौरस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ गतीरोधक देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.प्रशासनाचे कायम दुर्लक्षचौरस्त्यावर गतिरोधक देण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली. पण, या मागणीकडे प्रशसनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. गतिरोधक लावण्याचा ठराव ग्रामसभेतही मंजूर करण्यात आला असून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण, तरी देखील याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात