शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST

खरीपात तोंडचा घास पडल्यानंतर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त असते. यंदा खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर नंतर झालेल्या पावसामुळे पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा असतानाच जिल्ह्यात सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.

ठळक मुद्दे७० हजार २१० हेक्टरवर रबीचा पेरा

  लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदा खरीपात सोयाबीन उत्पादकांचे सततच्या पावसाने तर कपाशी उत्पादकांचे गुलाबी बोंडअळीने कंबर्डे मोडल्याने सिंचनाची सोय असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त आहे. याच पार्श्वभूमीवर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा एकूण ७० हजार २१०.८० हेक्टरवर रबी पिकांची लागवड केली आहे. यंदा गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.खरीपात तोंडचा घास पडल्यानंतर सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रबी पिकांवर भिस्त असते. यंदा खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर नंतर झालेल्या पावसामुळे पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा असतानाच जिल्ह्यात सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. तर याच सततच्या पावसादरम्यान गुलाबी बोंडअळीने डोकेवर काढून नुकसानीची पातळी गाठल्याने कापसाच्या उत्पादनात घट आली. असे असले तरी या आर्थिक नुकसानीला न जुमानता सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा रबी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ६१९.६५ हेक्टर असताना तब्बल ७०,२१०.८० हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.वेळीच मार्गदर्शन केल्यास शंकांचे होणार समाधानसध्या गहू, चणा व इतर रबी पिकांची स्थिती समाधानकारक आहे. पण ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण कायम आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून वेळोवेळी मार्गदर्शन केल्यास शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान होईल.

 

टॅग्स :agricultureशेती