जगाला बापूंच्या सिद्धांताची गरज

By Admin | Updated: January 31, 2016 02:17 IST2016-01-31T02:17:32+5:302016-01-31T02:17:32+5:30

महात्मा गांधीच्या पुण्यतिथी दिनी बापूकुटीत आल्याने मी पावन झालो. सरकारला काही विकायचे असेल तर गांधीजींचा फक्त ब्रॅड म्हणून वापर करतात.

The world needs Bapu's theories | जगाला बापूंच्या सिद्धांताची गरज

जगाला बापूंच्या सिद्धांताची गरज

राजेंद्रसिंह : सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रमातून आदरांजली
वर्धा : महात्मा गांधीच्या पुण्यतिथी दिनी बापूकुटीत आल्याने मी पावन झालो. सरकारला काही विकायचे असेल तर गांधीजींचा फक्त ब्रॅड म्हणून वापर करतात. मी बापूंना दहावीत असताना वाचले; परंतु त्यांची प्रतिकृती बनून मला एका अशिक्षित शेतकऱ्याने पाण्याच्या संरक्षणाची शिकवण दिली. आज जर बापू असते तर त्यांनी चरख्या ऐवजी पाणी वाचविण्याची शिकवण दिली असती. आज प्लास्टिकच्या बाटलीत २० रुपयांत पाणी मिळते. बापूंना माननारे लोक कमी होत आहे. परंतु त्यांचे सिद्धांत कधीच कमी होणार नाही. आजचा दिवस दु:खाचा नसून प्रेरणेचा आहे. विश्वाला पुढे पाउल ठेवण्याकरिता बापूंच्या सिद्धांताची गरज जलपुरूष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.
सेवाग्राम आश्रमात बापुंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुनीलकुमार लवटे यांनी १९७२ मध्ये सेवाग्राम भेटीचा उल्लेख केला. आचार्य विनोबा भावे व इंदिरा गांधी भेटीचा संवाद सांगितला. महात्मा गांधी फक्त भारताचे नाही तर विश्वाचे आहेत. दुर्देव आहे आज सरकारी नोकरी करणाऱ्यांना ५० हजारांची सेवानिवृत्ती मिळते आणि शेतकऱ्याला काहीच नाही. भरत महोदय यांनी कुमारप्पा यांची माहिती दिली. संचालन जयवंत मठकर यांनी केले तर आभार डॉ. श्रीराम जाधव मानले. यावेळी अनेकांना येथे येत बापूंना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)

Web Title: The world needs Bapu's theories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.