शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी महिलांना मिळते मोफत विधी सेवा; जिल्ह्यात गेल्यावर्षी २१९ प्रकरणे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:23 IST

कौटुंबिक हिंसाचार कायदा : ३८८ प्रकरणे झाली प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत मागील वर्षभरात ३८८ प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी २१९ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. या कालावधीत एकूण ५२ प्रकरणे निकाली निघाली असून, पीडितांना नवसंजीवनी मिळाली आहे.

महिलांसाठी गरजेचा असलेल्या केंद्र सरकारच्या या कायद्यामुळे पीडितांना वेळीच न्याय मिळत असून कौटुंबिक हिंसाचारापासून पीडितांना संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्यांना शासनाचा दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. २१९ प्रकरणे न्यायालयात पोहोचली होती. त्यापैकी ५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रक्रियेत आहे.

मोफत मिळते विधी सेवाकायद्यांतर्गत वर्धा जिल्ह्यात जिल्हास्तरावर संरक्षण अधिकारी व विधि सल्लागार कार्यरत आहेत. तालुका स्तरावर तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी कार्यरत आहेत व त्यांच्यामार्फत प्राप्त प्रकरण न्यायालयाकडे दाखल करण्याची कार्यवाही केली जाते. कायद्यानुसार संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांना कायदेशीर, वैद्यकीय, पोलिस मदतीसह मोफत विधि सेवा मिळवून दिली जाते तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी वेळोवेळी केली जाते

२००६ पासून देशभरात अस्तित्वात आला कायदा...कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे सरंक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अन्वये कुटुंबातील व्यक्तींकडून महिलांच्या होणाऱ्या छळास प्रतिबंध करण्याकरिता सदरचा अधिनियम केंद्र शासनाच्या दि. १७ ऑक्टोंबर २००६ च्या अधिसूचनेद्वारे दि. २६ ऑक्टोबर २००६ पासून देशभरात अस्तित्वात आलेला आहे. या कायद्यामुळे अनेक महिलांना न्याय मिळाला असून त्यांना आधार मिळाला आहे. या कायद्यान्वये प्राप्त तक्रारींची तत्काळ दखल घेत अशी प्रकरणे न्यायप्रविष्ट करुन ती निकाली काढली जात आहे.

"जिल्ह्यात तालुकास्तरावर संरक्षण अधिकाऱ्यांचे कार्यालय असून, पीडित महिला या कायद्यांतर्गत संपर्क करून आपले प्रकरण न्यायप्रविष्ट करू शकते."- मनीषा कुरसंगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाwardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी