शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी महिलांना मिळते मोफत विधी सेवा; जिल्ह्यात गेल्यावर्षी २१९ प्रकरणे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:23 IST

कौटुंबिक हिंसाचार कायदा : ३८८ प्रकरणे झाली प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत मागील वर्षभरात ३८८ प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी २१९ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. या कालावधीत एकूण ५२ प्रकरणे निकाली निघाली असून, पीडितांना नवसंजीवनी मिळाली आहे.

महिलांसाठी गरजेचा असलेल्या केंद्र सरकारच्या या कायद्यामुळे पीडितांना वेळीच न्याय मिळत असून कौटुंबिक हिंसाचारापासून पीडितांना संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्यांना शासनाचा दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. २१९ प्रकरणे न्यायालयात पोहोचली होती. त्यापैकी ५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रक्रियेत आहे.

मोफत मिळते विधी सेवाकायद्यांतर्गत वर्धा जिल्ह्यात जिल्हास्तरावर संरक्षण अधिकारी व विधि सल्लागार कार्यरत आहेत. तालुका स्तरावर तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी कार्यरत आहेत व त्यांच्यामार्फत प्राप्त प्रकरण न्यायालयाकडे दाखल करण्याची कार्यवाही केली जाते. कायद्यानुसार संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांना कायदेशीर, वैद्यकीय, पोलिस मदतीसह मोफत विधि सेवा मिळवून दिली जाते तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी वेळोवेळी केली जाते

२००६ पासून देशभरात अस्तित्वात आला कायदा...कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे सरंक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अन्वये कुटुंबातील व्यक्तींकडून महिलांच्या होणाऱ्या छळास प्रतिबंध करण्याकरिता सदरचा अधिनियम केंद्र शासनाच्या दि. १७ ऑक्टोंबर २००६ च्या अधिसूचनेद्वारे दि. २६ ऑक्टोबर २००६ पासून देशभरात अस्तित्वात आलेला आहे. या कायद्यामुळे अनेक महिलांना न्याय मिळाला असून त्यांना आधार मिळाला आहे. या कायद्यान्वये प्राप्त तक्रारींची तत्काळ दखल घेत अशी प्रकरणे न्यायप्रविष्ट करुन ती निकाली काढली जात आहे.

"जिल्ह्यात तालुकास्तरावर संरक्षण अधिकाऱ्यांचे कार्यालय असून, पीडित महिला या कायद्यांतर्गत संपर्क करून आपले प्रकरण न्यायप्रविष्ट करू शकते."- मनीषा कुरसंगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :Domestic Violenceघरगुती हिंसाwardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारी