शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

दहा महिन्यांत १३ शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

हवालदील झालेला शेतकरीही जगावा या उद्देशाने आर्वी तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. इतकेच नव्हे तर यंदाच्या वर्षी खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले.

ठळक मुद्देशेतकरी हितार्थ मोहीम राबविण्याची गरज : शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास दिलासा

पुरुषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. यंदाही परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले आहे. शिवाय व्यापाऱ्यांकडूनही शेतकºयांची लुबाडणूक केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दहा महिन्यात तालुक्यातील तब्बल १३ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. तशी नोंदही तालुका प्रशासनाने घेतली आहे. हवालदील झालेला शेतकरीही जगावा या उद्देशाने आर्वी तालुक्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. इतकेच नव्हे तर यंदाच्या वर्षी खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. तर त्यानंतर झालेल्या पावसामुळे अंकुरलेल्या पिकांना नवसंजीवणी मिळाली. परंतु, सोयाबीन पीक कापणीवर आल्यावर परतीच्या पावसाने हजेरी लावली. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातही शासनाकडून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देताना ३३ टक्केच्यावर आणि ३३ टक्केच्या खाली झालेल्या नुकसानीचे कारण पुढे करीत अनेकांना शासकीय मदतीपासून डावलण्यात आले. अशातच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यातच त्यांचे मनोधैर्य खचले आणि दहा महिन्यात तब्बल १३ शेतकऱ्यांची आत्महत्येचा कठोर निर्णय घेतल्याचे वास्तव आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने तटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे. परंतु, सदर शासकीय रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसून शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा आहे.पीककर्ज देण्यास बँकांचा नकारपीक कर्ज घेण्यासाठी बँकांची उंबरठेच शेतकऱ्यांना झीजवावे लागते. सर्व कागदपत्र गोळा करून रितसर अर्ज केल्यावरही पीक कर्ज देण्यास तालुक्यातील काही बँकांकडून साफ नकार दिल्या जातो. अशातच शेतकरी सावकाराच्या दारात उभा होतो. शिवाय जादा व्याजदरात कर्ज घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे सहज उपलब्ध होईल या दिशेने जिल्हाधिकाऱ्यांनी पाऊल टाकावे, अशी मागणी या भागातील शेतकºयांची आहे.पाच वर्षांत ११० आत्महत्यागेल्या पाच वर्षात आर्वी तालुक्यातील कर्जबाजरी पणाला कंटाळून तब्बल ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे.२०१४ ला १२, २०१५ ला २४, २०१६ ला १९, २०१७ ला २१ तर २०१८ ला २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही तालुका प्रशासनाने घेतली आहे.विमा कंपन्यांकडून लुबाडणूकनिसर्गाच्या लहरीपणा लक्षात घेता सध्या शेती करणे कठीण झाले आहे. एखाद्या वेळी शेतीत नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी म्हणून तालुक्यातील अनेक शेतकरी विम्याचे कवच घेतात. परंतु, नुकसान झाल्यावर विमा कंपन्यांकडून वेगवेगळे नियम सांगून शेतकऱ्यांची बोळवणूकच केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विमा कंपन्यांनाही वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.मागील पाच वर्षात ११० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मागील दहा महिन्यात १३ शेतकऱ्यांची आत्महत्या केली आहे.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरी