शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

वर्ध्यात भेसळयुक्त ‘नेपाळी’ खाद्यतेलाची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 1:11 PM

Wardha News वर्धा बाजारपेठेतील घाऊक तेल दुकानांतून नेपाळ येथून आलेल्या भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री होत आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेलाचे नमुने घेतले.

ठळक मुद्देघाऊक विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर साठा एफडीएने चार दुुकानांतून घेतले नमुने

 लोकमत न्यूज नेटवर्क    

वर्धा : बाजारपेठेतील घाऊक तेल दुकानांतून नेपाळ येथून आलेल्या भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री होत आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेलाचे नमुने घेतले. मात्र, जप्तीची कारवाई करण्यात आली नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोयाबीनसह, शेेंगदाणा, सूर्यफूल, राइस ब्रान आदी खाद्यतेलाचे भाव मध्यंतरी गगनाला भिडले होते. सोयाबीन १६० ते १७० रुपये प्रतिकिलो, शेेंगदाणा तेल १८० ते २०० आणि सूर्यफूल तेल १६५ ते १७० रुपये किलो दराने मिळत होते. आता सोयाबीन आणि सूर्यफूल या खाद्यतेलाच्या दरात २० ते २२ रुपयांनी घसरण झाली आहे. खाद्यतेलाचे भडकलेले दर पाहता वर्ध्याच्या बाजारात भेसळयुक्त तेल विक्रीला उधाण आले आहे. घाऊक विक्रेत्यांकडून वर्ध्यातील किराणा दुकानदारांना नेपाळहून आलेल्या ‘राजहंस’ असे ब्रान्ड नेम असलेल्या तेलाची विक्री होत आहे. या तेलात पाम तेलाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकही खरेदीला पसंती देत आहेत. घाऊक विक्रेत्यांकडून आठवडाभरात ५०० ते ६०० टिन डब्यांचा किराणा दुकानदारांना पुरवठा केला जात आहे. वर्ध्याच्या संपूर्ण बाजारपेठेत या नेपाळहून आलेल्या तेलाचा बोलबाला आहे. मात्र, भेसळयुक्त या तेलाच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. एका ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने चार दुकानांतून दुकानातून या भेसळयुक्त खाद्यतेलाचे नमुने घेऊन औपचारिकता पूर्ण केली. मात्र, खाद्यतेल जप्त करीत विक्री थांबविण्यात आली नाही. त्यामुळे या विभागाच्या कार्यप्रणालीविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नमुन्याचा अहवाल येतो दोन महिन्यांनी

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न निरीक्षकांनी खाद्यतेलाचा नमुना घेत प्रयोगशाळेत पडताळणीकरिता पाठविला. मात्र, नमुन्याचा अहवाल तब्बल दोन महिन्यांनी या विभागाला प्राप्त होतो. तोपर्यंत भेसळयुक्त तेल जिल्ह्याच्या तळागाळात पोहोचणार आहे. यातूनच आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्यामुळे या भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा घाऊक विक्रेत्यांकडून जप्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्राहकांनो, सावधान....!

वर्ध्यातील घाऊक विक्रेत्यांकडे नेपाळहून आलेल्या राजहंस असे ब्रान्ड नेम असलेल्या भेसळयुक्त तेलाचा साठा मोठ्या प्रमाणावर असून किरकोळ किराणा दुकानादारांना याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत आहे. एक घाऊक विक्रेता आठवडाभरात ५०० ते ६०० टिन डब्यांची विक्री करीत आहे. ग्राहकांनी खाद्यतेलाची खरेदी करताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

महागाई भडकल्याने भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री होण्याची शक्यता आहे. विभागाकडून शहरातील बाजारपेठेतून तपासणीकरिता खाद्यतेलाचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर घाऊक, किरकोळ विक्रेत्यांकडील साठा जप्त केला जाईल.

-जयंत वाणे, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन विभाग, वर्धा.

टॅग्स :foodअन्न