शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

का स्वीकारला कष्टकरी आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग?

By महेश सायखेडे | Updated: November 23, 2022 14:51 IST

हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा

वर्धा : राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्येचा कठोर निर्णय घेणाऱ्यांत आदिवासी शेतकऱ्यांचाही समावेश आहे. एकट्या वर्धा जिल्ह्यात एक दशकात चक्क १४२ आदिवासी शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले, तर मागील नऊ वर्षांत ७७ आदिवासी शेतकऱ्यांनी शेती कसण्यास असमर्थता दर्शविली आहे.

राज्यातील ही संख्या नक्कीच मोठी असून, आदिवासी शेतकरी बांधव कुठल्या कारणांमुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत, शिवाय यासह विविध बाबींची कारणमीमांसा करण्यासाठी शासन स्तरावर विशेष समिती स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत शिंदे-फडणवीस सरकार ठोस निर्णय घेईल, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांना असून, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नाकारली जाते शासकीय मदत

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत गत दहा वर्षांत १४२ आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली; पण त्यापैकी केवळ ७२ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत, तर तब्बल ७० प्रकरणे शासकीय मदतीसाठी नाकारण्यात आली आहेत.

वर्धासारख्या छोट्या जिल्ह्यात मागील दहा वर्षांत १४२ आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे, तसेच नऊ वर्षांत ७७ आदिवासी शेतकऱ्यांनी शेती कसण्यास असमर्थता दर्शविणे ही चिंतेची बाब आहे. राज्याचा विचार आदिवासी शेतकरी कुठल्या कारणांमुळे आत्महत्या तसेच शेती करण्यास असमर्थता दर्शवित आहेत याची विशेष समिती स्थापन करून कारणमीमांसा होण्याची गरज आहे.

- अवचित सयाम, आदिवासी नेते, वर्धा

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूagricultureशेती