शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

का स्वीकारला कष्टकरी आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग?

By महेश सायखेडे | Updated: November 23, 2022 14:51 IST

हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा

वर्धा : राज्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्येचा कठोर निर्णय घेणाऱ्यांत आदिवासी शेतकऱ्यांचाही समावेश आहे. एकट्या वर्धा जिल्ह्यात एक दशकात चक्क १४२ आदिवासी शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले, तर मागील नऊ वर्षांत ७७ आदिवासी शेतकऱ्यांनी शेती कसण्यास असमर्थता दर्शविली आहे.

राज्यातील ही संख्या नक्कीच मोठी असून, आदिवासी शेतकरी बांधव कुठल्या कारणांमुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेत आहेत, शिवाय यासह विविध बाबींची कारणमीमांसा करण्यासाठी शासन स्तरावर विशेष समिती स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत शिंदे-फडणवीस सरकार ठोस निर्णय घेईल, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांना असून, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नाकारली जाते शासकीय मदत

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत गत दहा वर्षांत १४२ आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली; पण त्यापैकी केवळ ७२ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत, तर तब्बल ७० प्रकरणे शासकीय मदतीसाठी नाकारण्यात आली आहेत.

वर्धासारख्या छोट्या जिल्ह्यात मागील दहा वर्षांत १४२ आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे, तसेच नऊ वर्षांत ७७ आदिवासी शेतकऱ्यांनी शेती कसण्यास असमर्थता दर्शविणे ही चिंतेची बाब आहे. राज्याचा विचार आदिवासी शेतकरी कुठल्या कारणांमुळे आत्महत्या तसेच शेती करण्यास असमर्थता दर्शवित आहेत याची विशेष समिती स्थापन करून कारणमीमांसा होण्याची गरज आहे.

- अवचित सयाम, आदिवासी नेते, वर्धा

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूagricultureशेती