शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

देशात अंधार पसरतो तेव्हा महाराष्ट्रच प्रकाश करतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:41 IST

कन्हैय्या कुमार: शेखर शेंडे यांच्या प्रचारार्थ सेलूत सभा

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : या देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. काँग्रेसविना या देशाचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. जेव्हा देशात अंधार पसरतो तेव्हा महाराष्ट्रच प्रकाश करतो. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठबळ द्या, असे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.

महाविकास आघाडीचे वर्धा विधानसभेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेखर शेंडे यांच्या सेलूतील प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेला उमेदवार शेखर शेंडे, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, शैलेश अग्रवाल, अभ्युदय मेघे, प्रवीण हिवरे, समीर देशमुख, अनिल देवतारे, अविनाश काकडे, महेंद्र मुनेश्वर, उद्धवसेनेचे बाळू मिरापूरकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी सुरुवातीपासून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांकरिता शिक्षणाची सुविधा केली नसती तर कल्पना चावला झाली नसती. त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे. देशात संविधान बदलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे; पण एकमत देशात एकता घेऊन आले आहे, हेही विसरून चालणार नाही. 

५०-५० कोटी रुपये घेऊन सत्तेत बसणारे गद्दार आहेत, त्यांना धडा शिकविणारी ही निवडणूक आहे. या काळात विकासाच्या बाता केल्या जात आहेत. एकीकडे महागाई वाढली; पण शेतमालाचे भाव वाढले नाहीत. शेतकरी, शेतमजूर, युवकांसमोरील बेरोजगारी यांवर बोलायचे सोडून सत्ताधारी धर्माच्या गोष्टी करतात. त्यामुळे आता निवडणुकीतून हरविलेले मुद्दे जागृत करण्याची गरज आहे. असेही कन्हैय्या कुमार म्हणाले. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. महिलांना प्रतिमहा तीन हजार, शंभर टक्के प्रवास सवलत, युवकांच्या हातांना काम, बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपयांचा भत्ता देणार तसेच शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी व प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांचा विमा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन करून काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

ही सर्वसामान्यांच्या हिताची लढाई : शेखर शेंडे सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, युवकांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांना सुखाने जगता येत नाही, अशी परिस्थिती या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवार किवा पक्षाची नसून ही सर्वसामान्यांच्या हिताची, सर्वाच्या अस्तित्वाची लडाई असून आपण सर्वांनी एकजुटीने ही लढ्या आणि जिंकूया, असे मत शेखर शेंडे यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kanhaiya kumarकन्हैय्या कुमारwardha-acवर्धा