शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाचा प्रस्तावावर प्रत्यक्ष कृती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:34 IST

अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष : पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे. परंतु, अद्यापही त्यावर प्रत्यक्ष कृती झाली नसल्याचे सांगण्यात येते. गुरूवारी पालमंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर असून त्यांनी हा विषय मार्गी लावावा अशी मागणी वर्धेकरांची असून ते आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून सदर विषय मार्गी लावण्यासाठी थेट मुंबई दरबारी संवाद साधतील काय, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय तर २० लघु जलाशय आहेत. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच लघु जलाशयांनी तळ गाठला. तर मे महिन्यात अर्धेअधीक मोठे व मध्यम जलाशय मृत जलसाठ्यावर आले. तर सध्यास्थितीत दमदार पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच जलाशय कोरडे आहेत. भविष्यातही मान्सून सक्रीय राहण्याच्या कालावधीत दमदार पाऊस न झाल्यास वर्धेत पाणीबाणीच निर्माण होणार आहे. अशातच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार १७९ पशुधन आणि १३ लाख ७७७ लोकसंख्येचा आणि अंकुरलेल्या पिकांचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, असा प्रस्ताव तयार केला.शिवाय तो महाराष्ट्र शासनाच्या मदत व पूनर्वसन विभागाच्या सचिवांकडे १५ जुलैला पाठविला आहे. परंतु, सुमारे नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर अद्याप कुठलाही विचार झालेला नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.मान्सून सक्रीय राहण्याचा जून आणि जुलै हाच महत्त्वपूर्ण महिना असून भविष्यातील धोके आणि नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची सध्या नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनीही हा विषय गुरूवारी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, असे ‘लोक’मत आहे.दमदार पावसाची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाजरुसलेल्या वरुणराजाने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर टाकली आहे. दमदार पाऊसाची प्रतीक्षा सर्वांनाच असली तरी २४ ते २८ जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस न होण्याचा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. तशा सूचनाही वर्धा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून बाळगली जातेय कमालीची गुप्ततावर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा विनंती प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला असला तरी जिल्हा प्रशासनातीलच निवासी उपजिल्हाधिकाºयांकडून सदरची संपूर्ण माहिती कुणाला मिळू नये म्हणून कलालीची गुप्तता बाळगली जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसcollectorजिल्हाधिकारी