शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

कृत्रिम पावसाचा प्रस्तावावर प्रत्यक्ष कृती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:34 IST

अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष : पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे. परंतु, अद्यापही त्यावर प्रत्यक्ष कृती झाली नसल्याचे सांगण्यात येते. गुरूवारी पालमंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर असून त्यांनी हा विषय मार्गी लावावा अशी मागणी वर्धेकरांची असून ते आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून सदर विषय मार्गी लावण्यासाठी थेट मुंबई दरबारी संवाद साधतील काय, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय तर २० लघु जलाशय आहेत. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच लघु जलाशयांनी तळ गाठला. तर मे महिन्यात अर्धेअधीक मोठे व मध्यम जलाशय मृत जलसाठ्यावर आले. तर सध्यास्थितीत दमदार पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच जलाशय कोरडे आहेत. भविष्यातही मान्सून सक्रीय राहण्याच्या कालावधीत दमदार पाऊस न झाल्यास वर्धेत पाणीबाणीच निर्माण होणार आहे. अशातच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार १७९ पशुधन आणि १३ लाख ७७७ लोकसंख्येचा आणि अंकुरलेल्या पिकांचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, असा प्रस्ताव तयार केला.शिवाय तो महाराष्ट्र शासनाच्या मदत व पूनर्वसन विभागाच्या सचिवांकडे १५ जुलैला पाठविला आहे. परंतु, सुमारे नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर अद्याप कुठलाही विचार झालेला नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.मान्सून सक्रीय राहण्याचा जून आणि जुलै हाच महत्त्वपूर्ण महिना असून भविष्यातील धोके आणि नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची सध्या नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनीही हा विषय गुरूवारी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, असे ‘लोक’मत आहे.दमदार पावसाची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाजरुसलेल्या वरुणराजाने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर टाकली आहे. दमदार पाऊसाची प्रतीक्षा सर्वांनाच असली तरी २४ ते २८ जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस न होण्याचा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. तशा सूचनाही वर्धा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून बाळगली जातेय कमालीची गुप्ततावर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा विनंती प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला असला तरी जिल्हा प्रशासनातीलच निवासी उपजिल्हाधिकाºयांकडून सदरची संपूर्ण माहिती कुणाला मिळू नये म्हणून कलालीची गुप्तता बाळगली जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसcollectorजिल्हाधिकारी