शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

कृत्रिम पावसाचा प्रस्तावावर प्रत्यक्ष कृती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:34 IST

अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष : पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे. परंतु, अद्यापही त्यावर प्रत्यक्ष कृती झाली नसल्याचे सांगण्यात येते. गुरूवारी पालमंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर असून त्यांनी हा विषय मार्गी लावावा अशी मागणी वर्धेकरांची असून ते आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून सदर विषय मार्गी लावण्यासाठी थेट मुंबई दरबारी संवाद साधतील काय, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय तर २० लघु जलाशय आहेत. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच लघु जलाशयांनी तळ गाठला. तर मे महिन्यात अर्धेअधीक मोठे व मध्यम जलाशय मृत जलसाठ्यावर आले. तर सध्यास्थितीत दमदार पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच जलाशय कोरडे आहेत. भविष्यातही मान्सून सक्रीय राहण्याच्या कालावधीत दमदार पाऊस न झाल्यास वर्धेत पाणीबाणीच निर्माण होणार आहे. अशातच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार १७९ पशुधन आणि १३ लाख ७७७ लोकसंख्येचा आणि अंकुरलेल्या पिकांचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, असा प्रस्ताव तयार केला.शिवाय तो महाराष्ट्र शासनाच्या मदत व पूनर्वसन विभागाच्या सचिवांकडे १५ जुलैला पाठविला आहे. परंतु, सुमारे नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर अद्याप कुठलाही विचार झालेला नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.मान्सून सक्रीय राहण्याचा जून आणि जुलै हाच महत्त्वपूर्ण महिना असून भविष्यातील धोके आणि नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची सध्या नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनीही हा विषय गुरूवारी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, असे ‘लोक’मत आहे.दमदार पावसाची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाजरुसलेल्या वरुणराजाने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर टाकली आहे. दमदार पाऊसाची प्रतीक्षा सर्वांनाच असली तरी २४ ते २८ जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस न होण्याचा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. तशा सूचनाही वर्धा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून बाळगली जातेय कमालीची गुप्ततावर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा विनंती प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला असला तरी जिल्हा प्रशासनातीलच निवासी उपजिल्हाधिकाºयांकडून सदरची संपूर्ण माहिती कुणाला मिळू नये म्हणून कलालीची गुप्तता बाळगली जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Rainपाऊसcollectorजिल्हाधिकारी