शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नियम धाब्यावर बसवून उडाले विवाह सोहळ्यांचे बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे.

ठळक मुद्देचार भिंतींआड होताहेत बैठका। जिल्ह्यात कोरोनाचे पाऊल पडते पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना लपून-छपून कार्यक्रम, बैठका उरकणाऱ्यावर भर दिला जात असून यात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राजकीय पक्षही भान हरपले आहेत. त्यांच्याकडूनही बिनधास्तपणे सत्कार सोहळे आयोजित केले गेले. या प्रकरणात नुकतेच आयोजकांसह उपस्थितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदी लागू असल्याने बैठक घेण्यावरही बंदी असताना लपून-छपून चार भिंतींआड विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून बैठका घेतल्या जात आहेत. विवाह सोहळ्यापूर्वी होणारा मांसाहारी जेवणावळीचा कंदुरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला दोनशेवर नागरिकांची गर्दी उसळली. यातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने इतवारा परिसरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची बाब लक्षात घेत प्रशासनाने तीन दिवस तातडीचे लॉकडाऊन जाहीर केले. चार महिन्यांपासून लॉकडाऊनच राहावे लागत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. ‘चूक एकाची आणि मनस्ताप सर्वांना’ असा काहीसा प्रकार नागरिकांच्याच बेशिस्त कृतीमुळे घडत आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असताना त्यांच्याकडूनच बंदीच्या काळातही कार्यक्रम, बैठका आणि विवाह सोहळ्यात मर्यादेपेक्षा अधिक गर्दी जमवून बेकायदेशीर कृत्य केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने यापुढे समारंभांना परवानगीच देऊ नये, असा सूर सुजाण नागरिकांतून आळविला जात आहे. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या