शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नियम धाब्यावर बसवून उडाले विवाह सोहळ्यांचे बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे.

ठळक मुद्देचार भिंतींआड होताहेत बैठका। जिल्ह्यात कोरोनाचे पाऊल पडते पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना लपून-छपून कार्यक्रम, बैठका उरकणाऱ्यावर भर दिला जात असून यात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राजकीय पक्षही भान हरपले आहेत. त्यांच्याकडूनही बिनधास्तपणे सत्कार सोहळे आयोजित केले गेले. या प्रकरणात नुकतेच आयोजकांसह उपस्थितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदी लागू असल्याने बैठक घेण्यावरही बंदी असताना लपून-छपून चार भिंतींआड विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून बैठका घेतल्या जात आहेत. विवाह सोहळ्यापूर्वी होणारा मांसाहारी जेवणावळीचा कंदुरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला दोनशेवर नागरिकांची गर्दी उसळली. यातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने इतवारा परिसरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची बाब लक्षात घेत प्रशासनाने तीन दिवस तातडीचे लॉकडाऊन जाहीर केले. चार महिन्यांपासून लॉकडाऊनच राहावे लागत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. ‘चूक एकाची आणि मनस्ताप सर्वांना’ असा काहीसा प्रकार नागरिकांच्याच बेशिस्त कृतीमुळे घडत आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असताना त्यांच्याकडूनच बंदीच्या काळातही कार्यक्रम, बैठका आणि विवाह सोहळ्यात मर्यादेपेक्षा अधिक गर्दी जमवून बेकायदेशीर कृत्य केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने यापुढे समारंभांना परवानगीच देऊ नये, असा सूर सुजाण नागरिकांतून आळविला जात आहे. 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या