शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती सिखाती है साहाब...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:50 IST

बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही.

ठळक मुद्देबालकदिन विशेष : पाठ्यपुस्तकाअभावी चिमुकल्यांच्या हातात भिक्षापात्र

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही. कचऱ्यातून आपल्या आयुष्याचा शोध घेणारेही आपल्याला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहावयास मिळतात. समाजही सुशिक्षीततेचा आव आणून त्यांना धुडकावून लावतात. अनवाणी पाय आणि अर्ध झाकलेल्या शरीराने फिरत असणाऱ्या बालकांना त्यांच्या या आयुष्याबाबत विचारले तर ‘हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती शिखाती है साहाब...!’ अशी केविलवानी व्यथा ते मांडतात. त्यांचे हेच शब्द कानावर पडताच अंगावर काटा उभा होतो. तेव्हा दरवर्षी बालकदिन साजरा करतो तरीही या मुलांवर कुणाचे लक्ष का पडले नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य बालकांना हाती भिक्षापात्र घ्यायला भाग पाडतात.शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच गल्लीबोळात ही मुले भीक मागून जीवन जगत आहे. हातात पाठ्यपुस्तक घेण्याऐवजी भिक्षापात्र आल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर पोटाचा प्रश्न थोपविला गेला आहे.उन्हाचे चटके, हवेचा मारा आणि थंडीचा गारठा झेलत उघड्यावर जीवन जगणाºया या गोंडस बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ८ ते १२ वर्ष वयोगटातील ही कोवळी मुलं पोट भरण्याची सोय करण्यासाठी लग्न समारंभ किंवा हॉटेलमधील उष्टे अन्न खाऊन जगतात. उघड्यावरचे जीवन जगणाऱ्या चिमुल्यांना शरिराच्या स्वच्छतेचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांची लागणही त्यांना होते. शिवाय कुणाचाही वचक व धाक नसल्याने ही मुले व्यसनाधीनतेकडे आणि नंतर गुन्हेगारीकडे वळतात; पण या धकाधकीच्या आभासी जगात त्या बेघर असलेल्या चिमुकल्यांप्रती समाजमनही निष्ठूर झाल्याचे दिसून येत आहे.उपचाराची वानवा असल्याने या बालकांना ताप, खोकला, हातापायावर सुजन तसेच कावीळ सारखे आजार असल्याचेही एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. अशा बिकट परिस्थित मिळेल ते काम करुन दिशाहीन जीवन जगत आहे. त्यांना शिक्षणाचा गंध नसल्याने शिक्षणाचा अ,ब,क,ड ही माहीत नाही. त्यामुळे देशाची भावी पिढी बालकांमध्ये पाहणाºया या समाजाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. या बालकांना जगण्याचा मार्ग दाखविला तरच खºया अर्थाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विचारातील ‘बालक दिन’ साजरा होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :children's dayबालदिन