शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती सिखाती है साहाब...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:50 IST

बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही.

ठळक मुद्देबालकदिन विशेष : पाठ्यपुस्तकाअभावी चिमुकल्यांच्या हातात भिक्षापात्र

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही. कचऱ्यातून आपल्या आयुष्याचा शोध घेणारेही आपल्याला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहावयास मिळतात. समाजही सुशिक्षीततेचा आव आणून त्यांना धुडकावून लावतात. अनवाणी पाय आणि अर्ध झाकलेल्या शरीराने फिरत असणाऱ्या बालकांना त्यांच्या या आयुष्याबाबत विचारले तर ‘हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती शिखाती है साहाब...!’ अशी केविलवानी व्यथा ते मांडतात. त्यांचे हेच शब्द कानावर पडताच अंगावर काटा उभा होतो. तेव्हा दरवर्षी बालकदिन साजरा करतो तरीही या मुलांवर कुणाचे लक्ष का पडले नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य बालकांना हाती भिक्षापात्र घ्यायला भाग पाडतात.शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच गल्लीबोळात ही मुले भीक मागून जीवन जगत आहे. हातात पाठ्यपुस्तक घेण्याऐवजी भिक्षापात्र आल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर पोटाचा प्रश्न थोपविला गेला आहे.उन्हाचे चटके, हवेचा मारा आणि थंडीचा गारठा झेलत उघड्यावर जीवन जगणाºया या गोंडस बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ८ ते १२ वर्ष वयोगटातील ही कोवळी मुलं पोट भरण्याची सोय करण्यासाठी लग्न समारंभ किंवा हॉटेलमधील उष्टे अन्न खाऊन जगतात. उघड्यावरचे जीवन जगणाऱ्या चिमुल्यांना शरिराच्या स्वच्छतेचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांची लागणही त्यांना होते. शिवाय कुणाचाही वचक व धाक नसल्याने ही मुले व्यसनाधीनतेकडे आणि नंतर गुन्हेगारीकडे वळतात; पण या धकाधकीच्या आभासी जगात त्या बेघर असलेल्या चिमुकल्यांप्रती समाजमनही निष्ठूर झाल्याचे दिसून येत आहे.उपचाराची वानवा असल्याने या बालकांना ताप, खोकला, हातापायावर सुजन तसेच कावीळ सारखे आजार असल्याचेही एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. अशा बिकट परिस्थित मिळेल ते काम करुन दिशाहीन जीवन जगत आहे. त्यांना शिक्षणाचा गंध नसल्याने शिक्षणाचा अ,ब,क,ड ही माहीत नाही. त्यामुळे देशाची भावी पिढी बालकांमध्ये पाहणाºया या समाजाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. या बालकांना जगण्याचा मार्ग दाखविला तरच खºया अर्थाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विचारातील ‘बालक दिन’ साजरा होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :children's dayबालदिन