शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती सिखाती है साहाब...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:50 IST

बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही.

ठळक मुद्देबालकदिन विशेष : पाठ्यपुस्तकाअभावी चिमुकल्यांच्या हातात भिक्षापात्र

सचिन देवतळे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : बालकांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले. त्यानुसार विविध सामाजिक संस्था कामही करीत आहे. परंतू तरीही अनेक बालकांचा दिवस हातात भिक्षापात्र घेऊन उगवतो आणि मावळतोही. कचऱ्यातून आपल्या आयुष्याचा शोध घेणारेही आपल्याला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पहावयास मिळतात. समाजही सुशिक्षीततेचा आव आणून त्यांना धुडकावून लावतात. अनवाणी पाय आणि अर्ध झाकलेल्या शरीराने फिरत असणाऱ्या बालकांना त्यांच्या या आयुष्याबाबत विचारले तर ‘हमे शौक नही...सबकूछ परिस्थिती शिखाती है साहाब...!’ अशी केविलवानी व्यथा ते मांडतात. त्यांचे हेच शब्द कानावर पडताच अंगावर काटा उभा होतो. तेव्हा दरवर्षी बालकदिन साजरा करतो तरीही या मुलांवर कुणाचे लक्ष का पडले नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य बालकांना हाती भिक्षापात्र घ्यायला भाग पाडतात.शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच गल्लीबोळात ही मुले भीक मागून जीवन जगत आहे. हातात पाठ्यपुस्तक घेण्याऐवजी भिक्षापात्र आल्याने खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर पोटाचा प्रश्न थोपविला गेला आहे.उन्हाचे चटके, हवेचा मारा आणि थंडीचा गारठा झेलत उघड्यावर जीवन जगणाºया या गोंडस बालकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ८ ते १२ वर्ष वयोगटातील ही कोवळी मुलं पोट भरण्याची सोय करण्यासाठी लग्न समारंभ किंवा हॉटेलमधील उष्टे अन्न खाऊन जगतात. उघड्यावरचे जीवन जगणाऱ्या चिमुल्यांना शरिराच्या स्वच्छतेचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांची लागणही त्यांना होते. शिवाय कुणाचाही वचक व धाक नसल्याने ही मुले व्यसनाधीनतेकडे आणि नंतर गुन्हेगारीकडे वळतात; पण या धकाधकीच्या आभासी जगात त्या बेघर असलेल्या चिमुकल्यांप्रती समाजमनही निष्ठूर झाल्याचे दिसून येत आहे.उपचाराची वानवा असल्याने या बालकांना ताप, खोकला, हातापायावर सुजन तसेच कावीळ सारखे आजार असल्याचेही एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. अशा बिकट परिस्थित मिळेल ते काम करुन दिशाहीन जीवन जगत आहे. त्यांना शिक्षणाचा गंध नसल्याने शिक्षणाचा अ,ब,क,ड ही माहीत नाही. त्यामुळे देशाची भावी पिढी बालकांमध्ये पाहणाºया या समाजाने तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. या बालकांना जगण्याचा मार्ग दाखविला तरच खºया अर्थाने पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या विचारातील ‘बालक दिन’ साजरा होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :children's dayबालदिन