शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:08 PM

शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.

ठळक मुद्देवळविलेले पाणीही संपले : आता पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या येळाकेळी येथील योजनेच्या विहिरीने तळ गाठला. यामुळे नगर परिषदेच्यावतीने सिंचन विभागाचे पाणी वळवून या विहिरीच्या परिसरात आणले. ते पाणी आज शहरातील काही भागात पोहोचले तर काही भाग कोरडा राहिला. आता हे पाणीही संपले असल्याने येळाकेळी येथील पाणी पुरवठा योजनेला कोरड पडली आहे. येथे पाणी नसल्याने शहरातील नागरिकांची तहान कशी भागवावी अशी चिंता नगर परिषदेला पडली आहे.शहरवासीयांना पाणी पुरविण्याकरिता नगरपरिषदेच्यावतीने कायद्याचे उलंघन करून सिंचन विभागाचे पाणी योजनेच्या विहिरीपर्यंत आणले. हे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शहरातील नागरिकांना पाठविले. यात प्रतापनगर व साबळे प्लॉट परिसर वगळता इतर भागात पाणी पोहोचले. यामुळे नागरिकांकडून पाण्याचा साठा करण्यात आला. यातून दोन दिवसाची गरज भागेल पण नंतर काय करावे अशी चिंता आता पालिका प्रशासनासह वर्धेकर नागरिकांना पडली आहे. येळाकेळी येथील नदी खोदून पाणी जमा करून एक दिवस पाणी पुरवठा करण्यात आला. आता तसे करणे शक्य नसल्याचे दिसून आले. हा प्रकार अधिक प्रमाणात केल्यास आसपासच्या परिसरात पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पाऊस येण्याची सध्या चिन्हे दिसत नाही. तर धाम प्रकल्पातील पाणी सोडण्याकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी पाणी पुरवठा विभागाच्या विहिरीत पाणी येणे शक्य नाही. यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे धाम प्रकल्पाचे पाणी सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चर्चेत काय मार्ग निघतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.नगर परिषदेच्या वतीने सिंचन विभागाचे पाणी असे वळविले होतेनगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने तयार केलेल्या बंधाऱ्यात पाण्याचा एकही थेंब दिसत नसल्याने रविवारी सकाळच्या सुमारास पालिकेच्यावतीने या परिसरात असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीत सिंचन विभागाचे पाणी सोडले. यामुळे शहरातील काही नळांना पाणी आले. आता मात्र येथे पाण्याचा ठणठणाट झाला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले आहे.