शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

जलसंधारणाची कामे मनरेगातून करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:36 IST

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या मनरेगाच्या कामांना भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला.

ठळक मुद्देधर्मवीर झा : केंद्रीय पथकांनी केली कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या मनरेगाच्या कामांना भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला. यावेळी मनरेगामधून होणाऱ्या कामांमध्ये ६० टक्के कामे जलसंधारणाची घ्याव्यात, अशा सूचना मनरेगाचे संचालक धर्मवीर झा यांनी केल्यात.या पथकामध्ये मनरेगा कार्यक्रम अधिकारी सोनल कुलश्रेष्ठ, अनिलकुमार कट्टा, वैभव माहेश्वरी, म्रीदुल गर्ग, राजकुमार दत्ता यांचा समावेश होता. या पथकाने कारंजा तालुक्यातील येनगाव येथे फळबाग लाभार्थी श्रीराम चोपडे आणि शिलाबाई देवासे यांच्या शेतात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शिवाय मधुकर चोपडे यांच्या शेतात मनरेगामधून करण्यात आलेल्या सिंचन विहिरीची पाहणी करण्यात आली. पालोरा ग्रामपंचायत येथे जागो मानमोडे यांच्या घरकुलास भेट देऊन पाहणी केली. शिवाय आर्वी तालुक्यातील सावळापूर येथील रोप वाटिकेतील कामाचे निरीक्षण केले. ग्रामपंचायतीमधील नरेगा सबंधी दस्तऐवज, योजनेसंबंधी कामाचे भिंतीफलक, ग्रामपंचायतमधील १ ते ७ नमून्यांचे अद्यावतीकरण, नवीन नमुन्यातील जॉब कार्ड वितरण आदी अभिलेखांची तपासणी केली.क्षेत्रीय भेटीनंतर केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मनरेगाच्या कामांचे सादरीकरण केले. यात २०१८-१९ या वर्षात १ लाख ७८ हजार ४४३ मनुष्य दिवस काम निर्मिती झाल्याचे सांगितले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार कुटुंबांना जॉब कार्ड वितरित करण्यात आले आहेत. यापैकी १८ हजार ६२७ नागरिकांनी कामाची मागणी केली असून १२ हजार ४७१ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ७४ कुटुंबाने १०० दिवस काम केले आहे. यात ९३ टक्के लोकांना वेळेवर वेतन देण्यात आले आहे. मनरेगामधून मार्च २९१८ पर्यंत ४ हजार २६१ मंजूर विहिरींपैकी २ हजार ४७० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी २ हजार २१४ लाभार्थ्यांचे वीज पंप जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाले असून २ हजार ४ लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली आहे. जॉब कार्ड तपासणीचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी नवाल यांनी पथकाला दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती आदी उपस्थित होते.