शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाची कामे मनरेगातून करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:36 IST

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या मनरेगाच्या कामांना भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला.

ठळक मुद्देधर्मवीर झा : केंद्रीय पथकांनी केली कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या मनरेगाच्या कामांना भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला. यावेळी मनरेगामधून होणाऱ्या कामांमध्ये ६० टक्के कामे जलसंधारणाची घ्याव्यात, अशा सूचना मनरेगाचे संचालक धर्मवीर झा यांनी केल्यात.या पथकामध्ये मनरेगा कार्यक्रम अधिकारी सोनल कुलश्रेष्ठ, अनिलकुमार कट्टा, वैभव माहेश्वरी, म्रीदुल गर्ग, राजकुमार दत्ता यांचा समावेश होता. या पथकाने कारंजा तालुक्यातील येनगाव येथे फळबाग लाभार्थी श्रीराम चोपडे आणि शिलाबाई देवासे यांच्या शेतात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शिवाय मधुकर चोपडे यांच्या शेतात मनरेगामधून करण्यात आलेल्या सिंचन विहिरीची पाहणी करण्यात आली. पालोरा ग्रामपंचायत येथे जागो मानमोडे यांच्या घरकुलास भेट देऊन पाहणी केली. शिवाय आर्वी तालुक्यातील सावळापूर येथील रोप वाटिकेतील कामाचे निरीक्षण केले. ग्रामपंचायतीमधील नरेगा सबंधी दस्तऐवज, योजनेसंबंधी कामाचे भिंतीफलक, ग्रामपंचायतमधील १ ते ७ नमून्यांचे अद्यावतीकरण, नवीन नमुन्यातील जॉब कार्ड वितरण आदी अभिलेखांची तपासणी केली.क्षेत्रीय भेटीनंतर केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मनरेगाच्या कामांचे सादरीकरण केले. यात २०१८-१९ या वर्षात १ लाख ७८ हजार ४४३ मनुष्य दिवस काम निर्मिती झाल्याचे सांगितले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार कुटुंबांना जॉब कार्ड वितरित करण्यात आले आहेत. यापैकी १८ हजार ६२७ नागरिकांनी कामाची मागणी केली असून १२ हजार ४७१ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ७४ कुटुंबाने १०० दिवस काम केले आहे. यात ९३ टक्के लोकांना वेळेवर वेतन देण्यात आले आहे. मनरेगामधून मार्च २९१८ पर्यंत ४ हजार २६१ मंजूर विहिरींपैकी २ हजार ४७० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी २ हजार २१४ लाभार्थ्यांचे वीज पंप जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाले असून २ हजार ४ लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली आहे. जॉब कार्ड तपासणीचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी नवाल यांनी पथकाला दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती आदी उपस्थित होते.