शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणीच पाणी चोहीकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:23 IST

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५४ मिमी. नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनदी-नाल्यांना पूर : लालनाला व नांद प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; गावांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५४ मिमी. नोंद करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ३७.३० मिमी पावसाची नोेंद केली. या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील लालनाला आणि हिंगणघाट तालुक्यातील नांद प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले.यासोबतच वर्धा तालुक्यात २०.८१ मिमी, सेलू ९.८० मिमी, देवळी ३७.१५ मिमी, आर्वी २८.९१ मिमी, आष्टी २४.६६ मिमी, कारंजा १९.०८ मिमी, समुद्रपूर ३५.८६ मिमी पाऊस झाला असून जिल्ह्यात एकूण २१२.३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतीपिकांना नवसंजीवनी मिळाली असून सध्या काही भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.लालनाला प्रकल्पाचे ५ दरवाजे २५ सेंमीने उघडलेकोरा: पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्प पुर्णत: भरला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ वाजता या प्रकल्पाचे ५ दरवाजे २५ सेमीने उघडले असून त्यातून ७४.१८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसाच्या पाण्याने हा प्रकल्प आता शंभर टक्के भरला आहे. मागील वर्षी हा प्रकल्प २२ सप्टेंबरला १०० टक्के भरला होता.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल दीड महिन्यापूर्वीच हा प्रकल्प फुल्ल झाला आहे. या प्रकल्पाचे सध्या पाच दरवाजे उघडले असून यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाळा नदीत सोडले जाते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत असल्याने पूर बघण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. येथील पुरामुळे चिखली, आसोला व डोंगरगाव यासह इतरही गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि प्रलक्प अधिकारीही यावर लक्ष देऊन आहे. पावसाची संततधार आणि पाणी पातळी लक्षात घेता आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाणी सोडताना कार्यकारी अभियंता एस.बी.काळे, उपअभियंता सुहास साळवे, सहाय्यक अभियंता शशांक वर्मा यांच्यासह १० कर्मचारी उपस्थित होते.नांद प्रकल्पाच्या सात दरवाज्यातून पाण्याचा विसर्गहिंगणघाट: सततच्या मुसळधार पावसामुळे वणा नदीवरील नांद धरण आज दुपारी २ वाजता ७१.६४ टक्के भरले. त्यामुळे या प्रकल्पातून ६८३.५२ क्युबिक मीटर प्रतीसेकंद पाण्याचा प्रवाह असल्याने सुरुवातीला या प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर सायकाळपर्यंत सात दरवाजे दोन मीटर पर्यंत उघडले असून यातून ११२२.३५ सेमी.प्रती सेकंद पावसाचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असुन जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून चांगलीच उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. खरिपातील कपाशी व सोयाबीन पीक हातुन जाण्याच्या मार्गावर होते. परंतु या पावसाने सध्यातरी शेतकऱ्यांना जीवनदान दिल्याचे दिसून येते.चिंतातूर शेतकऱ्यांची चिंता दूरघोराड - परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांची सध्यातरी चिंता मिटल्याचे बोलले जात आहे. रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले आणि आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात आलेल्या सरींनी खरीप हंगामात पेरणीची सुरुवात झाली. पण, त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. पण, आता आषाढ सरी शेतकºयांची पिक वाचविण्यासाठी चाललेली धडपड थांबविण्यास पोषक ठरल्या आहे. बुधवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने सध्याच्या पाऊस हा पिकांची खुंटलेली वाढ करण्यास उपयुक्त ठरणार आहे.हा पाऊस कपाशी व सोयाबीन पिकाला पोषक ठरणारा आहे. या पावसामुळे विहिरीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरडवाहू शेतकºयांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून हा पाऊस थांबताच शेतकरी खत, फवारणीच्या तयारी करीत आहे. हा पाऊस असाच सुरु राहिल्यास शेतकºयांच्या निंदनाच्या खर्चात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर