शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
3
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
4
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
6
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
7
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
8
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
9
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
10
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
11
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
12
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
13
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
14
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
15
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
16
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
17
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
18
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
19
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
20
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

टँकरद्वारे पाणी पुरवठा नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 9:52 PM

शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देग्रा.पं. चा पुढाकार : प्रति कुटुंबाला मिळते दोन ड्रम पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.पिपरी (मेघे) ग्रामपंचायतला जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो. जलाशयाने तळ गाठल्यामुळे नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने काही भागात सहाव्या दिवशी तर काही भागात दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील विहिरी व कुपननिकांही कोरड्याठाक झाल्याने काही भागात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु आहे. आगामी समस्या लक्षात घेता ग्रामपंचायतने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली होती. पण, प्रशासनाने टँकर उपलब्ध करुन न दिल्याने शेवटी ग्रामपंचायतनेच लोकसहभागातून तीन टँकर मिळवून पाणी समस्येवर मात केली आहे. दररोज आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. सोमवारी सकाळपासून सावजीनगर, पेंदाम ले-आऊट, गांजरे ले-आऊट व मालेकर ले-आऊट या परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला आहे. प्रत्येक कुटूंबाला दोन ड्रम पाणी पुरविले जात आहे. कमी पाणी मिळत असले तरीही नागरिकांचा त्रास वाचल्याचे सांगितले जात आहे.यांनी दिला सहकार्याचा हातग्रामपंचायत पिपरी (मेघे) परिसरातील भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून १२ हजार लिटर क्षमतेचा १ टँकर भेट देण्यात आला.पण, एका टँकरने ही समस्या निकाली निघणारी नसल्यामुळे आमदार डॉ.पंकज भोयर मित्र परिवार आणि सरपंच अजय गौळकर मित्र परिवाराच्यावतीने ५ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या तिन्ही टँकरच्या सहाय्याने सध्या पाणी पुरवठा सुरु आहे.गावातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. आता पाण्यासाठी नागरिकांची होणारी पायपीट पाहून ग्रामपंचायत प्रशासनाने लोकसहभागातून समस्या निकाली काढण्याचा ठराव घेतला. त्यानुसार तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. प्रति कुटूंबाला दोन ड्रम पाणी यानुसार पाणीपुरवठा सुरु असून नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.-अजय गौळकर, सरपंच, पिपरी (मेघे).