शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

येळाकेळीच्या ‘उन्नई’ची पाणी साठवण क्षमता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

येळाकेळी येथील उन्नई बंधाºयातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देगाळाचा फटका : वर्धा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे चुकतेय नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी येळाकेळी येथील उन्नई बंधारा येथे अडविल्या जाते. त्यानंतर तेथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील नागरिकांना केला जातो. असे असले तरी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने उन्नई बंधाऱ्याची पाणी सावठण क्षमताच कमी झाली आहे. या बंधाºयाला गाळमुक्त करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. परंतु, ज्या उन्नई बंधाऱ्यातून वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याची उचल करते. त्याच बंधाऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमताच कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उचल संस्था असलेल्या वर्धा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी पुरवठ्याचे नियोजनच चूकत आहे.येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातील गाळवेळीच न काढल्यास वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरणी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. यासाठी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.पालिकेकडून पत्रव्यवहार; पण कार्यवाही शून्ययेळाकेळी येथील उन्नई बंधारा गाळमुक्त व्हावा या हेतूने वर्धा नगर पालिकेने वर्धा पाटबंधारा विभागाकडे पत्र व्यवहार केले. परंतु, पाटबंधारे विभागातील काही अधिकारी हा विषय मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड वर्धा नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे वर्धा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.वर्षाला देतेय ५० लाखधाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले आणि उन्नई बंधारा येथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा मोबदला म्हणून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा पाटबंधारे विभागाला वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचा मोेबदला देते. परंतु, उन्नई बंधाऱ्यातून गाळ काढण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी