शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

येळाकेळीच्या ‘उन्नई’ची पाणी साठवण क्षमता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

येळाकेळी येथील उन्नई बंधाºयातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देगाळाचा फटका : वर्धा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे चुकतेय नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी येळाकेळी येथील उन्नई बंधारा येथे अडविल्या जाते. त्यानंतर तेथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील नागरिकांना केला जातो. असे असले तरी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने उन्नई बंधाऱ्याची पाणी सावठण क्षमताच कमी झाली आहे. या बंधाºयाला गाळमुक्त करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. परंतु, ज्या उन्नई बंधाऱ्यातून वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याची उचल करते. त्याच बंधाऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमताच कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उचल संस्था असलेल्या वर्धा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी पुरवठ्याचे नियोजनच चूकत आहे.येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातील गाळवेळीच न काढल्यास वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरणी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. यासाठी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.पालिकेकडून पत्रव्यवहार; पण कार्यवाही शून्ययेळाकेळी येथील उन्नई बंधारा गाळमुक्त व्हावा या हेतूने वर्धा नगर पालिकेने वर्धा पाटबंधारा विभागाकडे पत्र व्यवहार केले. परंतु, पाटबंधारे विभागातील काही अधिकारी हा विषय मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड वर्धा नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे वर्धा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.वर्षाला देतेय ५० लाखधाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले आणि उन्नई बंधारा येथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा मोबदला म्हणून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा पाटबंधारे विभागाला वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचा मोेबदला देते. परंतु, उन्नई बंधाऱ्यातून गाळ काढण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी