शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

जलशुद्धीकरण योजना रखडली

By admin | Updated: January 13, 2016 02:47 IST

राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

सहा वर्षांपासून योजना रखडली : पाईपलाईनचे काम खासगी प्लॉटमधूनपवनार : राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. येथील नागरिकांना आणखी किती दिवस शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार, असा संतप्त सवाल, उपस्थित केला जात आहे. येथे १ कोटी ८३ लाख रुपयांची योजना कित्येक दिवसांपासून शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. विहीर, टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे दिसून येते; पण पाणी पुरवठ्याची गावातील जुनी लाईन खराब झाली आहे. यामुळे नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. या कामास विलंब होत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. पाईपलाईनचा नकाशा तपासला असता नवीन ले-आऊटमधील प्लॉट धारकांच्या जागेत असल्याचे निदर्शनात आले. यामुळे सरपंच गांडोळे यांनी सदर प्लॉटमधून गेलेली पाईपलाईन काढून नवीन योग्य ठिकाणाहून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात पाईपलाईन नकाशा मंजूर करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे होते; पण तत्कालीन प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे योजनेच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. शिवाय कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे. योजनेचे काम असेच सुरू राहिल्यास आणखी एक वर्ष नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार नाही, अशीच शक्यता वर्तविली जात आहे. सध्या येथे कार्यरत जल शुद्धीकरण केंद्र हे क्षमतेने लहान असून यंत्राचीही कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी, नागरिकांना पुर्णत: शुद्ध पाणी मिळत नाही. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी, ब्लिचिंग व वीज बिलाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायत प्रशासनाला सहन करावा लागत आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्र लवकर सुरू झाल्यास मोठी बचत होऊ शकते. सध्या नागरिकांना विंधन विहिरीवरून पिण्याचे पाणी घ्यावे लागत आहे. विंधन विहिरीच्या पाण्याचे नमूने तपासले असता टीडीएस ५०० च्या वर असल्याचे समोर आले आहे. यावरून विंधन विहिरीचे पाणी शुद्ध असले तरी पिण्यास अपायकारक असल्याचे सिद्ध होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(वार्ताहर)