शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

जलशुद्धीकरण योजना रखडली

By admin | Updated: January 13, 2016 02:47 IST

राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

सहा वर्षांपासून योजना रखडली : पाईपलाईनचे काम खासगी प्लॉटमधूनपवनार : राष्ट्रीय पेय जलयोजनेंतर्गत २००८-०९ मध्ये मंजूर जलशुद्धीकरण योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे पवनारकरांना शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. येथील नागरिकांना आणखी किती दिवस शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार, असा संतप्त सवाल, उपस्थित केला जात आहे. येथे १ कोटी ८३ लाख रुपयांची योजना कित्येक दिवसांपासून शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. विहीर, टाकी व जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे दिसून येते; पण पाणी पुरवठ्याची गावातील जुनी लाईन खराब झाली आहे. यामुळे नवीन पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. या कामास विलंब होत असल्याचे कंत्राटदाराने सांगितले. पाईपलाईनचा नकाशा तपासला असता नवीन ले-आऊटमधील प्लॉट धारकांच्या जागेत असल्याचे निदर्शनात आले. यामुळे सरपंच गांडोळे यांनी सदर प्लॉटमधून गेलेली पाईपलाईन काढून नवीन योग्य ठिकाणाहून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात पाईपलाईन नकाशा मंजूर करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे होते; पण तत्कालीन प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे योजनेच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. शिवाय कामही अत्यंत संथगतीने सुरू आहे. योजनेचे काम असेच सुरू राहिल्यास आणखी एक वर्ष नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार नाही, अशीच शक्यता वर्तविली जात आहे. सध्या येथे कार्यरत जल शुद्धीकरण केंद्र हे क्षमतेने लहान असून यंत्राचीही कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी, नागरिकांना पुर्णत: शुद्ध पाणी मिळत नाही. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी, ब्लिचिंग व वीज बिलाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायत प्रशासनाला सहन करावा लागत आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्र लवकर सुरू झाल्यास मोठी बचत होऊ शकते. सध्या नागरिकांना विंधन विहिरीवरून पिण्याचे पाणी घ्यावे लागत आहे. विंधन विहिरीच्या पाण्याचे नमूने तपासले असता टीडीएस ५०० च्या वर असल्याचे समोर आले आहे. यावरून विंधन विहिरीचे पाणी शुद्ध असले तरी पिण्यास अपायकारक असल्याचे सिद्ध होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(वार्ताहर)