शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:55 IST

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही.

ठळक मुद्दे५०० ग्रा.पं.तील समस्या कायमच : लोकसंख्येनुसार अनुदान

रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही. परिणामी प्रत्येक गावांत रस्त्याने वाहणारे सांडपाणी आजही वाहतच असून रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे ढिग कायम आहेत.ग्रामीण भागात सांडपाण्याची समस्या बिकट रूप धरून आहे. ग्रामीण भागात घराघरातून निघणारे सांडपाणी रस्त्याच्या कडेने वाहत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. या पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता स्वच्छता विभागामार्फत नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. या सांडपाण्यासह गावातील घनकचरा व्यवस्थापनही करण्यात येणार होते. याकरिता जिल्हा परिषदेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्याला मंजुरीही मिळाली. ग्रामपंचायती या प्रकल्पाच्या मंजुरीकरिता प्राकलन तयार करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या सुचनेनुसार स्वच्छता विभागाच्यावतीने २२६ प्राकलन तयार करण्यात आले. तर २७५ ग्रामपंचायतीचे प्राकलन तयार करण सुरू आहे. सादर केलेल्या प्राकलनापैकी केवळ ७८ गावांच्या प्राकलनालाच मान्यता देण्यात आली आहे. मान्यता मिळाली तरी प्रत्यक्षात अद्याप काम सुरू करण्यात आले नाही. यामुळे गावांतील स्थिती अद्याप तशीच आहे. याकरिता निवड झालेल्या ग्रामपंचायतीला असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आहे.सांडपाण्याची व्यवस्था करताना या निधीतून नाली बांधकाम करण्यावर बंदी आहे. तर गावाच्या बाहेर येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेती वा इतर कामांकरिता वापर करण्याच्या सूचना शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य आणि गावाच्या स्वच्छतेकरिता महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप मुहूर्त करण्यात आला नाही. यामुळे स्वच्छ गावाच्या संकल्पनेला ब्रेक बसला आहे. याचा विचार होण्याची गरज आहे.ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदानया प्रकल्पाकरिता ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येत आहे. मिळणारे अनुदान गावाच्या लोकसंख्येवर आधारीत आहे. १५० कुटुंब असलेल्या गावांना ७ लाख रुपये मिळणार आहे. एवढी कुटुंब असलेली जिल्ह्यात २८ गावे आहेत. १५० ते ३०० कुटुंब असलेली जिल्ह्यात २२७ गावे असून अशा गावांना १२ लाख रुपये मिळणार आहे. ३०० ते ५०० कुटुंब असलेली १६१ गावे असून त्यांना १५ लाख रुपये मिळणार आहे. ५०० च्यावर कुटुंब असलेली ७५ गावे असून त्यांना २० लाख रुपये मिळणार आहे. यातून सांडपाणी आणि घनकचºयाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.२७ ग्रामपंचायतीच्या प्रकल्पांना मान्यतासादर करण्यात आलेल्या प्राकलनापैकी ७८ प्राकलनाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. तांत्रिक मंजुरी देण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. यातील २७ गावांत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र या निविदा केव्हा निघतील याची माहिती अद्याप कुणाला नाही.गावातील सांडपाणी रस्त्यावरशासनाच्यावतीने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना असून अंमलबजावणी अद्याप नाही. यामुळे गावातील रस्त्यांवर सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसत आहे.