शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:55 IST

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही.

ठळक मुद्दे५०० ग्रा.पं.तील समस्या कायमच : लोकसंख्येनुसार अनुदान

रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही. परिणामी प्रत्येक गावांत रस्त्याने वाहणारे सांडपाणी आजही वाहतच असून रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे ढिग कायम आहेत.ग्रामीण भागात सांडपाण्याची समस्या बिकट रूप धरून आहे. ग्रामीण भागात घराघरातून निघणारे सांडपाणी रस्त्याच्या कडेने वाहत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. या पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता स्वच्छता विभागामार्फत नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. या सांडपाण्यासह गावातील घनकचरा व्यवस्थापनही करण्यात येणार होते. याकरिता जिल्हा परिषदेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्याला मंजुरीही मिळाली. ग्रामपंचायती या प्रकल्पाच्या मंजुरीकरिता प्राकलन तयार करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या सुचनेनुसार स्वच्छता विभागाच्यावतीने २२६ प्राकलन तयार करण्यात आले. तर २७५ ग्रामपंचायतीचे प्राकलन तयार करण सुरू आहे. सादर केलेल्या प्राकलनापैकी केवळ ७८ गावांच्या प्राकलनालाच मान्यता देण्यात आली आहे. मान्यता मिळाली तरी प्रत्यक्षात अद्याप काम सुरू करण्यात आले नाही. यामुळे गावांतील स्थिती अद्याप तशीच आहे. याकरिता निवड झालेल्या ग्रामपंचायतीला असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आहे.सांडपाण्याची व्यवस्था करताना या निधीतून नाली बांधकाम करण्यावर बंदी आहे. तर गावाच्या बाहेर येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेती वा इतर कामांकरिता वापर करण्याच्या सूचना शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य आणि गावाच्या स्वच्छतेकरिता महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप मुहूर्त करण्यात आला नाही. यामुळे स्वच्छ गावाच्या संकल्पनेला ब्रेक बसला आहे. याचा विचार होण्याची गरज आहे.ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदानया प्रकल्पाकरिता ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येत आहे. मिळणारे अनुदान गावाच्या लोकसंख्येवर आधारीत आहे. १५० कुटुंब असलेल्या गावांना ७ लाख रुपये मिळणार आहे. एवढी कुटुंब असलेली जिल्ह्यात २८ गावे आहेत. १५० ते ३०० कुटुंब असलेली जिल्ह्यात २२७ गावे असून अशा गावांना १२ लाख रुपये मिळणार आहे. ३०० ते ५०० कुटुंब असलेली १६१ गावे असून त्यांना १५ लाख रुपये मिळणार आहे. ५०० च्यावर कुटुंब असलेली ७५ गावे असून त्यांना २० लाख रुपये मिळणार आहे. यातून सांडपाणी आणि घनकचºयाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.२७ ग्रामपंचायतीच्या प्रकल्पांना मान्यतासादर करण्यात आलेल्या प्राकलनापैकी ७८ प्राकलनाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. तांत्रिक मंजुरी देण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. यातील २७ गावांत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र या निविदा केव्हा निघतील याची माहिती अद्याप कुणाला नाही.गावातील सांडपाणी रस्त्यावरशासनाच्यावतीने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना असून अंमलबजावणी अद्याप नाही. यामुळे गावातील रस्त्यांवर सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसत आहे.