शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांनो सावधान, ...आव्हान सायबर गुन्हेगारीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

इंटरनेटच्या वापराने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञानामुळे ते तितकेच धोकादायक देखील बनले आहेत. त्यामुळे सायबर साक्षरता ही अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. कोणत्या मोड्स ऑपरेंडीला सर्वसामान्य संमोहित होऊन फसले जातात. ते टाळण्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्याव, यासाठी ‘लोकमत’ने आपल्या वाचकांसाठी केलेला हा विशेष वृत्तांत... 

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्याच्या युगात इंटरनेट हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. इंटरनेटच्या वापराने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञानामुळे ते तितकेच धोकादायक देखील बनले आहेत. त्यामुळे सायबर साक्षरता ही अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. कोणत्या मोड्स ऑपरेंडीला सर्वसामान्य संमोहित होऊन फसले जातात. ते टाळण्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्याव, यासाठी ‘लोकमत’ने आपल्या वाचकांसाठी केलेला हा विशेष वृत्तांत... सायबर गुन्हे हे असे गुन्हे आहेत ज्यात संगणक, इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक पातळीवर किंवा संस्था विरोधात कृत्य केले जाते. हे गुन्हे करण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट, ई मेल, चॅटरूम, पायरेटेड सॉफ्टवेअर, वेबसाईट आदी प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. तरुण मुले व महिला सायबर चोरट्यांच्या भूलथापांना लगेच बळी पडतात.

लॉटरीचे प्रलोभन...

लॉटरी लागल्याचे प्रलोभन देऊन सायबर चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले आहे. त्यामुळे लॉटरीची ऑफर प्राप्त झाल्यास सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे. आतापर्यंत २५ वर नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. 

सायबर गुन्ह्यांचे महत्त्वाचे प्रकार नोकरीचे आमिष; १० जणांना गंडा -   वाढत्या बेरोजगारीमुळे सायबर चोरट्यांनी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. यात तरुणांना निवड झाल्याची खोटी यादी पाठविली जते. त्यानंतर तत्काळ नियुक्ती करण्यासाठी पैशाची मागणी करीत खोटी आश्वासने दिली जातात. त्यामुळे अज्ञातांकडून नोकरीची ऑफर मिळाल्यास प्रथम त्याची सतत्यता तपासावी.

फिशिंग; १५ जण जाळ्यात -   अलीकडच्या काळात सर्वाधिक वापर वापरला जाणार हा प्रकार आहे. यात नागरिकांचे बॅंक डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मूळ संकेतस्थळासारखे दिसणारे बनावट संकेतस्थळ बनवून ग्राहकांची गोपनीय माहिती चोरली जाते. ई-मेल किंवा फोन करून बनावट वेब लिंक पाठवून माहिती घेऊन फसवणूक होते. अशा १५ जणांची लाखोंनी फसवणूक झाल्याची नोंद आहे.

लग्नाच्या आमिषाने फसवणूकविवाह जुळणाऱ्या संकेतस्थळावर  आकर्षक प्राेफाईल बनवून ठेवल्या आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वैयक्तिक फोटो शेअर केल्याने तरुणींच्या फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

‘आयडेंटी थेफ्ट’-   इंटरनेटचा वापर करताना आपल्या ओळखपत्राची माहिती अनोळखी माणसांना किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करु नका. -   सायबर चोरटे आपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे इतरांना आपण आहोत, असे भासवून त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने संवाद साधू शकतात. लकी ड्राॅ सारखे कुपन किंवा कोणताही फॉर्म भरताना याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

सायबर चोरट्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती केली आहे. मात्र, तरीही नागरिक पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी चोरट्यांचे फावते. इंटरनेटचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घेतल्यास गुन्हे रोखणे शक्य होऊ शकते. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.- महेंद्र इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सायबर सेल.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम