शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

वर्ध्याची कोरोनाच्या लढ्यातील वाटचाल देशासाठी आयडियल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:22 IST

प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.

ठळक मुद्देसीएमओ, पीएमओंनी घेतली दखल ऐतिहासिक भूमीतील भाजीबाजाराची सर्वत्र छाप

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुणित वर्ध्याच्या या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील केंद्रस्थान असलेल्या या भूमीतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. आताही कोरोनासारख्या महामारीच्या लढ्यात अद्याप ही भूमी सेफ झोन मध्ये ठेवण्यात यश आले आहे. याकरिता प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून कंबर कसली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही जाणीव ठेवून संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे. गर्दी टाळण्याकरिता शहरातील एक मुख्य भाजीबाजार १८ ठिकाणी विभाजित केला आहे. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आल्याने याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत प्रशासनाला शाबासकी दिली. याही पुढे जात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या पुढाकारातून रोटरी क्लबच्या सहाय्याने केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजीबाजार साकारण्यात आला. हा भाजीबाजार युनिक ठरला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने वर्धा पुन्हा देशपातळीवर पोहोचले आहे.मराठी चित्रपटांच्या नावातून जनजागृतीतुमच्या डार्लिंग सोबतच व्हिडिओ कॉलवरच बोला. विनाकारण प्रवास करणे टाळा. स्वत:ची काळजी घ्या भय•ाीत होऊ नका. नेहमी हात धुवा स्वच्छता राखा, काळजी घ्या आणि टकाटक राहा. थोडे दिवस पांघरुण घेऊन शांत झोपा. मुंबई-पुणे-मुंबई काही दिवस प्रवास नाही केला तरी चालेल. टपरीवर नको आता घरीच खारी बिस्कीट खा. जो काय टाइमपास करायचा ना तो घरी बसून करा. आता गच्चीच आपला हँग आऊट पॉइंट, अशाप्रकारे मराठी चित्रपटाच्या नावाने बाजाराच्या ठिकाणी फलक लावून जनजागृती केली जात आहे.म्हणून युनिक ठरला भाजीबाजारकेसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर रोटरी क्लबच्या सहकार्याने जवळपास ८० दुकानांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ग्राहकांना बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सावलीकरिता ग्रीन नेट टाकली असून सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत हा बाजार सुरू राहतो. या ठिकाणी हॅण्डवॉश, सॅनिटायझर तसेच सर्व दुकानदारांना एक किट दिली असून त्यात हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर व कापडी पिशव्या दिल्या आहेत. मध्यभागी असलेल्या स्टेजवरून वेळोवळी सूचना दिल्या जातात. बाहेर रस्त्याच्या बाजूला वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून महसूल विभाग, पोलीस प्रशासन, नगर पालिका व रोटरीचे पदाधिकारी येथे कार्यरत आहेत.काय म्हणतात, पीएमओ...वर्ध्यातील रोटरी क्लब आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आदर्श भाजीबाजार सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांच्या पीएमओ इंडिया रिपोर्ट कार्ड या फेसबूक अकाऊंटवर प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील छोट्याशा शहरात सामाजिक अंतर राखत भाजीबाजाराची इतकी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली, ती कौतुकास पात्र आहे. त्यामुळे या कोरोनाच्या महामारीत इतरही मेट्रोसिटीने आदर्श घेऊन सामाजिक अंतर राखावे असे म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस