शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वर्ध्याची कोरोनाच्या लढ्यातील वाटचाल देशासाठी आयडियल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:22 IST

प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.

ठळक मुद्देसीएमओ, पीएमओंनी घेतली दखल ऐतिहासिक भूमीतील भाजीबाजाराची सर्वत्र छाप

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुणित वर्ध्याच्या या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील केंद्रस्थान असलेल्या या भूमीतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. आताही कोरोनासारख्या महामारीच्या लढ्यात अद्याप ही भूमी सेफ झोन मध्ये ठेवण्यात यश आले आहे. याकरिता प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून कंबर कसली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही जाणीव ठेवून संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे. गर्दी टाळण्याकरिता शहरातील एक मुख्य भाजीबाजार १८ ठिकाणी विभाजित केला आहे. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आल्याने याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत प्रशासनाला शाबासकी दिली. याही पुढे जात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या पुढाकारातून रोटरी क्लबच्या सहाय्याने केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजीबाजार साकारण्यात आला. हा भाजीबाजार युनिक ठरला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने वर्धा पुन्हा देशपातळीवर पोहोचले आहे.मराठी चित्रपटांच्या नावातून जनजागृतीतुमच्या डार्लिंग सोबतच व्हिडिओ कॉलवरच बोला. विनाकारण प्रवास करणे टाळा. स्वत:ची काळजी घ्या भय•ाीत होऊ नका. नेहमी हात धुवा स्वच्छता राखा, काळजी घ्या आणि टकाटक राहा. थोडे दिवस पांघरुण घेऊन शांत झोपा. मुंबई-पुणे-मुंबई काही दिवस प्रवास नाही केला तरी चालेल. टपरीवर नको आता घरीच खारी बिस्कीट खा. जो काय टाइमपास करायचा ना तो घरी बसून करा. आता गच्चीच आपला हँग आऊट पॉइंट, अशाप्रकारे मराठी चित्रपटाच्या नावाने बाजाराच्या ठिकाणी फलक लावून जनजागृती केली जात आहे.म्हणून युनिक ठरला भाजीबाजारकेसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर रोटरी क्लबच्या सहकार्याने जवळपास ८० दुकानांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ग्राहकांना बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सावलीकरिता ग्रीन नेट टाकली असून सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत हा बाजार सुरू राहतो. या ठिकाणी हॅण्डवॉश, सॅनिटायझर तसेच सर्व दुकानदारांना एक किट दिली असून त्यात हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर व कापडी पिशव्या दिल्या आहेत. मध्यभागी असलेल्या स्टेजवरून वेळोवळी सूचना दिल्या जातात. बाहेर रस्त्याच्या बाजूला वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून महसूल विभाग, पोलीस प्रशासन, नगर पालिका व रोटरीचे पदाधिकारी येथे कार्यरत आहेत.काय म्हणतात, पीएमओ...वर्ध्यातील रोटरी क्लब आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आदर्श भाजीबाजार सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांच्या पीएमओ इंडिया रिपोर्ट कार्ड या फेसबूक अकाऊंटवर प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील छोट्याशा शहरात सामाजिक अंतर राखत भाजीबाजाराची इतकी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली, ती कौतुकास पात्र आहे. त्यामुळे या कोरोनाच्या महामारीत इतरही मेट्रोसिटीने आदर्श घेऊन सामाजिक अंतर राखावे असे म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस