शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याची कोरोनाच्या लढ्यातील वाटचाल देशासाठी आयडियल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 17:22 IST

प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.

ठळक मुद्देसीएमओ, पीएमओंनी घेतली दखल ऐतिहासिक भूमीतील भाजीबाजाराची सर्वत्र छाप

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुणित वर्ध्याच्या या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील केंद्रस्थान असलेल्या या भूमीतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. आताही कोरोनासारख्या महामारीच्या लढ्यात अद्याप ही भूमी सेफ झोन मध्ये ठेवण्यात यश आले आहे. याकरिता प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून कंबर कसली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही जाणीव ठेवून संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे. गर्दी टाळण्याकरिता शहरातील एक मुख्य भाजीबाजार १८ ठिकाणी विभाजित केला आहे. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आल्याने याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत प्रशासनाला शाबासकी दिली. याही पुढे जात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या पुढाकारातून रोटरी क्लबच्या सहाय्याने केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजीबाजार साकारण्यात आला. हा भाजीबाजार युनिक ठरला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने वर्धा पुन्हा देशपातळीवर पोहोचले आहे.मराठी चित्रपटांच्या नावातून जनजागृतीतुमच्या डार्लिंग सोबतच व्हिडिओ कॉलवरच बोला. विनाकारण प्रवास करणे टाळा. स्वत:ची काळजी घ्या भय•ाीत होऊ नका. नेहमी हात धुवा स्वच्छता राखा, काळजी घ्या आणि टकाटक राहा. थोडे दिवस पांघरुण घेऊन शांत झोपा. मुंबई-पुणे-मुंबई काही दिवस प्रवास नाही केला तरी चालेल. टपरीवर नको आता घरीच खारी बिस्कीट खा. जो काय टाइमपास करायचा ना तो घरी बसून करा. आता गच्चीच आपला हँग आऊट पॉइंट, अशाप्रकारे मराठी चित्रपटाच्या नावाने बाजाराच्या ठिकाणी फलक लावून जनजागृती केली जात आहे.म्हणून युनिक ठरला भाजीबाजारकेसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर रोटरी क्लबच्या सहकार्याने जवळपास ८० दुकानांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ग्राहकांना बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सावलीकरिता ग्रीन नेट टाकली असून सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत हा बाजार सुरू राहतो. या ठिकाणी हॅण्डवॉश, सॅनिटायझर तसेच सर्व दुकानदारांना एक किट दिली असून त्यात हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर व कापडी पिशव्या दिल्या आहेत. मध्यभागी असलेल्या स्टेजवरून वेळोवळी सूचना दिल्या जातात. बाहेर रस्त्याच्या बाजूला वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून महसूल विभाग, पोलीस प्रशासन, नगर पालिका व रोटरीचे पदाधिकारी येथे कार्यरत आहेत.काय म्हणतात, पीएमओ...वर्ध्यातील रोटरी क्लब आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आदर्श भाजीबाजार सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांच्या पीएमओ इंडिया रिपोर्ट कार्ड या फेसबूक अकाऊंटवर प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील छोट्याशा शहरात सामाजिक अंतर राखत भाजीबाजाराची इतकी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली, ती कौतुकास पात्र आहे. त्यामुळे या कोरोनाच्या महामारीत इतरही मेट्रोसिटीने आदर्श घेऊन सामाजिक अंतर राखावे असे म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस