शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वर्धा-नागपूर महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 5:00 AM

दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

ठळक मुद्देकेंद्र शासनाने तिन्ही कायदे रद्द करण्याची रेटली मागणी : पवनारात दोन्ही बाजूने लागल्या होत्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/पवनार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोनाला पाठिंबा देत, विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी, तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येत, शनिवारी दुपारी वर्धा-नागपूर महामार्गावरील पवनार येथे रास्तारोको आंदोलन केले. केंद्र शासनाने शेतकऱ्यांशी निगडित तिन्ही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू राहिल्याने वर्धा-नागपूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, गोपाल दुधाने, विठ्ठल झाडे, प्रफुल्ल कुकडे, माकपचे राज्य सचिव यशवंत झाडे, संजय भगत, समीर बोरकर, प्रभाकर धवने, भैय्या देशकर, दुर्गा काकडे, अर्चना घोघरे, आशा ईखार, रामभाऊ ठवरी, काँग्रेसचे मनोज चांदुरकर, सुधीर पांगुळ, अविनाश सेलुकर, पंकज इंगोले, मिलिंद मोहोड, अभिजीत चौधरी, आपचे प्रमोद भोमले, नितीन झाडे, मंगेश शेंडे, तुळशीराम वाघमारे, मनोज तायडे, महेंद्र मुनेश्वर, प्रभाकर चोंदे, निरज गुजर, मनोज कांबळे, पंकज सत्यकार, अस्लम पठाण, प्रसाद बागवे, राकाँचे ॲड.मिलिंद हिवलेकर, संजय काकडे, संदीप किटे, प्रवीण काटकर, योगेश घोगरे, पराग खंगार, ॲड.पूजा जाधव, श्रेया गोडे, जगदीश डोळसकर, गजेंद्र सुरकार, दिवाकर शंभरकर, सुरेश बोरकर, दिलीप मसराम, मधुकर भोयर, सुमेर ठाकूर, पवन दांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.  

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्धआंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेले. तेथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.पोलिसांची दमछाकआंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीतपवनार येथील रास्तारोको आंदोलनामुळे पवनार ते वर्धा तर पवनार ते सेलू या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल अर्धातासांचा कालावधी लागला, हे विशेष.

आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसादशनिवारी जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पंत.) हिंगणघाट, वायगाव, धोत्रा चौरस्ता आदी ठिकाणी शेतकरी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षासह डाव्या पक्षांनी रस्ता राेको आंदोलन केले. याला शेतकरी व शेतमजूरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप